प्रतिनिधी / रत्नागिरी
गेल्या २४ तासात प्राप्त अहवालांमध्ये ४३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या १६६१ झाली असून जिल्ह्यातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्हा कोव्हीड रुग्णालय, रत्नागिरी – १६ रुग्ण
उपजिल्हा रुग्णालय, कामथे – २० रुग्ण
कळबणी, खेड – २ रुग्ण
गुहागर – ५ रुग्ण
मुरडव, संगमेश्वर येथील एका ४५ वर्षीय रुग्णाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. सदर रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पेठकिल्ला, रत्नागिरी येथील ४० वर्षीय कोरोना रुग्ण तसेच मिरकरवाडा, रत्नागिरी येथील ४० वर्षीय महिला कोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच कालुस्ते, चिपळूण येथील ८० वर्षीय कोरोना उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता ५७ झाली आहे.