24 तासांत उत्तर कोकणात मुसळधार ते अतिमुसळधारचा इशारा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात कोसळणाऱया श्रावणसरींनी रविवारपासून पुन्हा एकदा जोर धरला आहे. जोरदार वाऱयासह पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. पुढील 24 तासात मुंबईसह उत्तर कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 4 आणि 5 ऑगस्ट दरम्यान मुंबई, ठाणे उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ही स्थिती 6 ऑगस्टपर्यंत कायम राहणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
श्रावण सुरू होताच ऊन-पावसाचा लपंडाव सुरू होतो. घटकेत ऊन तर घटकेत सावली असे वातावरण साऱयांनाच सुखावून जाते. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्य़ातही अशीच स्थिती पहावयास मिळत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस कोकणात पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. रविवार दुपारपासूनच अधूनमधुन जोरदार पावसाच्या सरी जिल्हाभरात कोसळू लागल्या असल्याचे चित्र आहे. सोमवारी सकाळी देखील सर्वत्र पाऊस बरसत होता.
रत्नागिरी जिल्हय़ाचा विचार करता यावर्षी आतापर्यंत जूनच्या प्रारंभापासून एकूण 1422.97 सरासरी पर्जन्यमान झालेले आहे. गतवर्षी 2 जुलै पर्यंतच्या या मुदतीत एकूण 2464.64 सरासरी इतकी पर्जन्यमानाची नोंद झालेली होती. त्यामानाने यावर्षीचे पर्जन्यमान कमालीचे मागे राहिले आहे. गेल्या चार वर्षातील यावर्षीचे सर्वात कमी सरासरी पर्जन्यमान असल्याचे सांगितले जात आहे. अशीच परिस्थिती यापुढे राहिल्यास जिल्हावासियांची चिंता वाढवणारी ठरणार आहे. आगामी काळात मोठय़ा पर्जन्यमानाची अपेक्षा बाळगली जात आहे.
सोमवारी सकाळपर्यंत जिल्हय़ात 24 तासांत झालेले पर्जन्यमानः
मंडणगड-34.30, दापोली-21.10, खेड-24, गुहागर-20.10, चिपळूण-30.50, संगमेश्वर-42.30, रत्नागिरी-33.30, लांजा-32, राजापूर-23.30, एकूण 260.90 मिमि तर सरासरी 28.99 पर्जन्यमान नोंद झाली आहे.