काँग्रेसचा आरोप
प्रतिनिधी /पणजी
गोवा मेडिकल कॉलेशमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाकासाठी मागास जाती मागास जमाती आणि इतर मागास जातींसाठी असलेली राखीवता मुंबई उच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्द केली आहे, त्याला जबाबदार सरकार असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर यांनी केला आहे. बहुजन समाजाच्या विरोधात काम करणाऱया भाजप सरकारने वेळीच योग्य सोपस्कर पूर्ण न केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे असेही चोडणकर म्हणाले.
काल पणजीत घेतलेल्या पत्रकार परीषदेत गिरीष चोडणकर बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत माजी केंद्रीयमंत्री व निरीक्षक पी. चिदंबरम, प्रभारी दिनेश गुंडुराव, विरोधी पक्षनेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत, एम. के. शेख, कार्यकारी अध्यक्ष आलेक्स सिक्वेर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय विचारसरणीचे भाजप सरकार नेहमी बहुजन समाजाच्या विरोधात काम करीत आहेत. बहुजन समाजाचे लोक उच्च पदावर गेलेले त्यांना पाहवत नाही म्हणूनच बहुजन समाजाचे पाय ओढण्याचे काम भाजप सरकार करीत असल्याचा आरोपही चोडणकर यांनी केला आहे.
दरम्यान जेष्ठ साहित्यीक दिलीप बोरकर यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत काल मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पी. चिदंबरम यांनी पुष्प गुच्छ देऊन बोरकर यांचे स्वागत केले तर दिगंबर कामत यांनी बोरकर यांचा रितसर काँग्रेस प्रवेश करून घेतला. यावेळी बोरकर म्हणाले की विद्यार्थी काळापासून आपण अनेक चळवळीमध्ये काम केले आहे. आपण पूर्वीपासून काँग्रेसचा सदस्य होतो मध्यानतराच्या काळात आपण गोवा फॉर्वडमध्ये प्रवेश केला होता. मात्र कालांतराने गोवा फॉर्वडचे नेते आणि आपल्या विचारामध्ये भिन्नता निर्माण झाल्याने आपण मौन बाळगुन गप्प बसलो होतो. काँग्रेसमध्ये पुनरप्रवेश करताना आपला कोणताही स्वार्थ नसून केवळ गोवा वाचविण्यासाठी काम करणे हाच आपला हेतू आहे. काँग्रेसच्या व्यासपीठावरून केवळ गोवा वाचविण्यासाठी आपण काम करणार असल्याचेही बोरकर म्हणाले.