स्वतःच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे. प्रवासी आता रात्रीच्या वेळी स्वतःचा मोबाईल किंवा लॅपटॉप रेल्वेत चार्ज करू शकणार नाहीत. भारतीय रेल्वेच्या या निर्णयामुळे हजारो प्रवासी प्रभावित होणार आहेत. एका वृत्तसंस्थेनुसार रेल्वेने हा निर्णय आग लागण्याच्या घटना विचारात घेत घेतला आहे.
रेल्वेने हा मोठा निर्णय प्रवाशांची सुरक्षा पाहूनच घेतला आहे. या निर्णयाच्या अंतर्गत रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत चार्जिंग पॉइंट स्विच ऑफ राहतील आणि यादरम्यान प्रवासी त्यांचा वापर करू शकणार नाहीत अशी माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे.
रेल्वे विभाग सतर्क
13 मार्च रोजी दिल्ली-देहरादून शताब्दी एक्स्प्रेसमध्ये आग लागली होती. ही आग एका डब्यातून सुरू होत पाहता पाहता 7 डब्यापर्यंत फैलावली होती. आगीमुळे कुठल्याही प्रवाशाला हानी पोहोचली नव्हती. सुदैवाने सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले होते. पण या घटनेनंतर रेल्वे विभाग सतर्क झाला आहे.
धूम्रपानाविरोधात अधिक कठोर
रेल्वेगाडीत धूम्रपानाच्या विरोधातील नियम अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धूम्रपान करणाऱयांच्या विरोधात आतापर्यंत कलम 167 अंतर्गत केवळ 100 रुपयांचा दंड ठोठावण्यात येत होता. दंडाची रक्कम आता वाढविण्याची योजना आहे. याचबरोबर दंडासह रेल्वेस्थानक परिसर किंवा रेल्वेगाडीत धूम्रपान करणाऱयांच्या विरोधात तुरुंगवासाचीही तरतूद करण्यात येणार आहे.
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली भारतीय रेल्वेने