प्रतिनिधी / वाळपई
शनिवारी रात्री व रविवारी दिवसभर सत्तरीच्या विविध भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात वादळी वारे झाल्यामुळे केळीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सत्तरीत जवळपास पाच लाखांपेक्षा जास्त केळी उत्पादनांची नुकसानी झाली असून यामुळे केळी उत्पादकांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. कृषी खात्याने याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन केळी उत्पादकांना आर्थिक पाठबळ देण्याची मागणी केलेली आहे.
सत्तरीत शनिवारी रात्री व रविवारी दिवसभर वादळी वारा व पाऊस झाला. याचा फटका कृषिबागायतीला बसला. सर्वात जास्त फटका केळी उत्पादकांना बसलेला आहे. अनेक केळी बागायतीमधील केळी मुळासकट उन्मळून पडली असून काही केळी अर्ध्यावरच मोडलेल्या आहेत. त्यामुळे केळी उत्पादनाची मोठय़ा प्रमाणात नुकसानी झालेली आहे. सतरी तालुका हा केळी उत्पादनासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. खास करून ‘रसबाळी’ व ‘सखलदाटी’ या केळय़ांच्या जातींसाठी हा परिसर प्रसिद्ध आहे. या जातीच्या केळय़ांना गोव्याच्या बाजारपेठेमध्ये प्रचंड मागणी आहे. यामुळे सत्तरीच्या अनेक गावांमध्ये आज मोठय़ा प्रमाणात लागवड होताना दिसत आहे.
अशा जातीच्या केळय़ांची लागवड सत्तरीत अनेक गावामध्ये झालेली आहे. मात्र यंदा शनिवारी व रविवारी वादळी वाऱयाचा फटका बसल्यामुळे मोठय़ा प्रमाणात उत्पादनाचे नुकसान झालेले आहे. यामुळे केळी उत्पादकांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्मयता आहे. ठाणे पंचायत, सावर्डे पंचायत, नगरगाव पंचायत क्षेत्र, खोतोडा पंचायत क्षेत्र, केरी पंचायत क्षेत्र या भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. विभागीय कृषि अधिकारी विश्वनाथ गावस म्हणाले की, सध्या तरी वाळपई विभागीय कृषी कार्यालयाचे पथक नुकसानीचा आढावा घेण्यासाठी विविध गावांमध्ये गेलेले आहेत. मंगळवारी संध्याकाळपर्यंत याबाबत सविस्तर अहवाल प्राप्त होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान नुकसानीचा प्रस्ताव विभागीय कृषी कार्यालयाशी आल्यास तो वरि÷ अधिकाऱयांपर्यंत पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.