ऑनलाईन टीम / काठमांडू :
नेपाळने भारतासोबतच्या सीमावादाबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे. नेपाळचे पंतप्रधान के.पी शर्मा ओली यांनी भारतासोबतचा सीमावाद चर्चेतून सोडवू,असे म्हटले आहे.
भारताच्या लिपुलेख, कालापानी आणि लिपिंयाधुरीसह भारताच्या 392 चौ किमी भूभागावर नेपाळने दावा ठोकला होता. या भूभागाचा मागील वर्षी नेपाळच्या नकाशातही समावेश करण्यात आला, त्याला नेपाळ संसदेने मान्यता दिली. त्यामुळे भारत आणि नेपाळचे संबंध काहीसे बिघडले आहेत.
मात्र, या भूभागाच्या वादावर भारतासोबत खुली आणि मैत्रीपूर्ण चर्चा करणार असल्याचे पंतप्रधान ओली यांनी एका परिसंवादात म्हटले आहे. मागील महिन्यात नवी दिल्लीत दोन्ही देशातील मंत्री स्तरावर यासंदर्भात बैठक पार पडली. मात्र, त्यात कोणताही तोडगा निघाला नाही.