टोल टॅक्समध्ये वाढ
ऑनलाईन टीम/ तरुण भारत
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे महागाईने जनता त्रस्त असताना सरकारने यातच आणखी एक झटका दिला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आजपासून रोडवरील प्रवास महागला आहे. म्हणजेच १ एप्रिल २०२२ पासून सरकारने राष्ट्रीय महामार्गावरील (NHAI) टोल करातही वाढ केली आहे. शुक्रवारी रात्री बारा वाजल्यापासून टोल टॅक्समध्ये वाढ करण्याचा सरकारचा निर्णय लागू झाला आहे.
दरम्यान, तोल दरात वाढ केल्याने याचा थेट परिणाम मालाच्या वाहतुकीवर आणि सामान्यतः एका शहरातून दुस-या शहरात जाणाऱ्या कारस्वारांवर होणार आहे. जनता पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे ट्रस्ट असताना आता सरकारने टोल टॅक्सचे दर वाढवल्यामुळे जनतेचा प्रवास महाग झाला आहे. आजपासून टोल टॅक्समध्ये सुमारे १० ते १२ टक्के वाढ झाली आहे.
सरकारने टोल टॅक्सचे दर वाढवल्यामुळे पूर्वी जे लोक दर महिन्याच्या पासवर (४० लोकांसाठी) ७६५ रुपये टोल म्हणून जमा करायचे, ते आता ८७५ रुपये जमा करतील. त्यामुळे आता दैनंदिन प्रवाशांवर सुमारे ११० रुपयांचा जादा बोजा पडणार आहे. एनएचएआयचा टोल वाढवण्याचा निर्णय टोलच्या देखभालीचा वाढता खर्च आणि टोल कंपन्यांच्या विनंतीवरून घेण्यात आला आहे. एका मीडिया हाऊसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, NHAI च्या संचालकांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, लोकांना आता दिल्लीला जोडणाऱ्या महामार्गावर अधिक टोल भरावा लागणार आहे. आता लोकांना सुमारे १० रुपये अधिक टोल भरावा लागणार आहे. त्याचबरोबर टोल वाढवण्याचा सर्वाधिक फटका मोठ्या वाहनांना बसणार असून त्यात सुमारे ६५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हे सर्व दर ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजल्यापासून लागू करण्यात आले आहेत.