राज्य सरकारकडून पुरस्कार जाहीर : दुसऱया वषीही उद्योग खात्रीतून सर्वाधिक काम देणारी ग्राम पंचायत म्हणून नोंद
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यातील विविध ग्राम पंचायतींना उत्तम काम केल्याबद्दल दरवर्षी पुरस्कार वितरित करण्यात येतात. राज्य सरकारने उद्योग खात्रीतून सर्वाधिक महिलांना काम मिळवून देणारी ग्राम पंचायत म्हणून कंग्राळी बुद्रुकची निवड केली. त्यामुळे सलग दुसऱया वषीही या ग्राम पंचायतीने महिलास्नेही पुरस्कार मिळविला असून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
2020-21 मध्ये कंग्राळी बुद्रुकला हा मान मिळाला होता तर आता 2021-22 चा महिलास्नेही पुरस्कारही याच ग्राम पंचायतीला मिळाला असल्याने संपूर्ण राज्यात नावलौकिक होत आहे. राज्यातील महिलास्नेही ग्राम पंचायत बनण्याचा मान कंग्राळी बुद्रुकला मिळाला आहे. त्यामुळे सोमवार दि. 14 मार्च रोजी बेंगळूर येथील विधानसौधमध्ये पुरस्कार देण्यात येणार आहे. ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, पीडीओ व इतर सदस्यांनी उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारावा, असे शासनातर्फे कळविण्यात आले आहे.
कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायतीने 2021-22 सालात उद्योग खात्रीतून महिलांना मोठय़ा प्रमाणात काम दिले आहे. या योजनेंतर्गत गावातील तसेच तालुक्मयातील अनेक गावांमध्ये विकास साधण्यात आला आहे. तलावे, नाले खोदाई करुन पाणी अडवून ते जमिनीत झिरपवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. परिणामी याचा फायदा शेतकऱयांना होणार आहे. याचबरोबर शेताकडील रस्ते व इतर कामेही करण्यात आल्याने विकास साधण्यात आला आहे. या योजनेतून सर्वाधिक कामे महिलांना मिळाली आहेत. त्यामुळे कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायतीला महिलास्नेही पुरस्कार देण्यात आला.