जम्मू / वृत्तसंस्था
खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा सोमवारी पुन्हा एकदा थांबवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये गेल्या 24 तासांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यानंतर जम्मू प्रशासनाने यात्रेकरुंना थांबवण्याचा निर्णय घेतला. मागील महिन्यात तीनवेळा अमरनाथ यात्रा रोखण्यात आली होती. एकदा ढगफुटीसदृश पाऊस कोसळल्यामुळे अमरनाथ यात्रेकरुंना जीवितहानीलाही सामोरे जावे लागले होते. सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. संततधार पाऊस कोसळल्यानंतर अमरनाथ गुहेकडे जाणाऱया यात्रेकरुंना धोकादायक ठिकाणांमधून पुढे रवाना करण्यास मज्जाव केला जात आहे.