नवी दिल्ली
ऑटो क्षेत्रातील टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांच्या उत्पादनाचा 40 लाखांचा आकडा गाठण्यात यश मिळवलं आहे. गेल्या तीन दशकापूर्वी दाखल झालेल्या टाटाने वरील टप्पा गाठला आहे. 1991 मध्ये टाटाने सिएरा ही कार भारतीय बाजारात उतरवले होती. या दरम्यानच्या काळात कंपनीने इंडिका, सिएरा, सुमो, सफारी आणि नॅनोसारख्या मॉडेल्स बाजारात दाखल केल्या आहेत. 2005-06 मध्ये कंपनीने 10 लाख उत्पादनाचा टप्पा पार केला तर 2015 मध्ये 30 लाखांचा टप्पा ओलांडला होता.