प्रतिनिधी/ पणजी :
दहावीची परीक्षा अखेर काल गुरुवारपासून सुरू झाली असून ती सुरळीत पार पाडण्यासाठी 3000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विविध प्रकारच्या व्यवसायिक विषयांची दहावी परीक्षा चालू झाली असून मुख्य विषयांची परीक्षा उद्या शनिवार दि. 23 मे पासून सुरु होत आहे.
एकूण 29 केंद्रातून परीक्षा चालू करण्यात आली असून त्याकरीता 19680 जणांनी नोंदणी केली आहे. गोव्याच्या सीमेपलीकडे महाराष्ट्र हद्दीत 4 तर कर्नाटक हद्दत 2 उपकेंद्रे तेथील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी करण्यात आली आहेत. प्रमुख विषयांची परीक्षा 1 जूनला संपुष्टात येणार असली तरी इतर काही विषय व विशेष मुलांची परीक्षा 6 जून पर्यंत संपणार असल्याचे सांगण्यात आले.
सर्व परीक्षा केंद्रे, उपकेंद्रे, त्यांचे आवार, आसने, सॅनिटाईझ करण्यात आली असून परीक्षेला जाणाऱया मुला-मुलींची तापमान तपासणी थर्मल गनने करण्यात येत आहे. शिवाय येता जाताना हातही सॅनिटाईझ केले जात असून मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. सामाजिक अंतराचे भानही राखण्यात येत असल्याची माहिती परीक्षा घेणाऱया गोवा बोर्डाच्या सुत्रांनी दिली. प्रत्येक वर्गात फक्त 12 जणांना प्रवेश व बसायला देण्यात येत असून एक बाक सोडून दुसऱया बाकावर अशा पद्धतीने आसन व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर येताना, बाहेर जाताना मुलांची तसेच केंद्राबाहेर पालकांची गर्दी होऊ नये, सामाजिक अंतराचे पालन व्हावे म्हणून दक्षता घेण्यात येत असल्याचे सुत्रांनी नमूद केले. प्रत्येक परीक्षा केंद्रावर, उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मार्गदर्शक तत्वानुसार कोर्टाच्या