प्रतिनिधी / बेळगाव
शहराच्या मध्यवर्ती भागात कोरानाची लागण झालेला रुग्ण आढळल्याने बाजारपेठेसह विविध परिसर निर्बंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. निर्बंधित क्षेत्र वगळता अन्य परिसरात व्यवसाय सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र सामाजिक अंतर राखण्याचा नियम धाब्यावर बसवून निर्बंधित क्षेत्रामधील सर्व व्यवसाय सुरू ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाची धास्ती नाही का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
कोरोना विषाणू संसर्ग एकामेकाच्या संपर्कात आल्याने होत आहे. त्यामुळे सामाजिक अंतर राखण्यासह मास्क वापरणे, हॅण्डग्लोव्ज घालणे आदींसह सॅनिटायझरचा वापर करणे अशा विविध अटी घालून व्यवसाय करण्याची मुभा शहरातील व्यावसायिकांना देण्यात आली आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढविला असला तरी निर्बंधित क्षेत्र वगळता अन्य परिसरातील व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण 42 दिवसांपासून घरात बंदिस्त असलेल्या नागरिकांनी संयम सोडला असून विविध साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केली आहे.
बाजारपेठेत खरेदी करताना सामाजिक अंतर पाळले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही व्यावसायिक मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करीत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बेळगाव बाजारपेठेत नागरिक व व्यावसायिकांनी सर्व नियम धाब्यावर बसविले असल्याचे निदर्शनास आले आहे. बेळगाव तालुक्मयातील हिरेबागेवाडी गावात दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बेळगाव शहरात लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. पण काही निर्बंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी व्यवसाय सुरू करण्यास काही अटांवर परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात विविध व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. पण शहराच्या मध्यवर्ती भागात कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळल्याने बाजारपेठेसह विविध परिसर निर्बंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असल्याने या परिसरात व्यवसाय करण्यास मुभा देण्यात आली नाही. मात्र निर्बंधित क्षेत्रात येणाऱया भातकांडे गल्ली, चावी मार्केट अशा विविध परिसरातील मसाल्याची दुकाने व किराणा दुकाने सुरू करण्यात आली आहेत.
खरेदी करताना सामाजिक अंतर पाळण्याचे भान नागरिकांना राहिले नाही. व्यावसायिकांनी सामाजिक अंतर ठेवण्याची सूचना करण्याकडे कानाडोळा केला होता. यामुळे दुकानांमध्ये गर्दी झाली होती. सर्व नियम धाब्यावर बसवून व्यवसाय सुरू ठेवण्यात आले असल्याने याला जबाबदार कोण, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. विषाणूंचा प्रसार झपाटय़ाने होऊनही नागरिकांमध्ये कोणतीच भीती नसल्याची बाब दिसून येत आहे. त्यामुळे काही किराणा साहित्य आणण्यासाठी बाजारपेठेत विनामास्क आणि सामाजिक अंतर न ठेवणारे नागरिक साहित्यासोबत कोरोना विषाणू मोफत आणण्याचा प्रकार करीत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. लॉकडाऊन काळात पाळलेले नियम व घेतलेल्या खबरदारीवर पाणी फेरले असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.