प्रतिनिधी / रत्नागिरी
निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दानादान उडाली आहे. अनेक ठिकाणी झाडेमाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणीचे मार्ग बंद झाले आहेत.समुद्रकिनारी लाटांचा तांडव सुरू आहे.
रत्नागिरीतील 3 तालुक्यांना वादळाचा मोठा धोका संभवतो आहे. रत्नागिरीतील मंडणगड, गुहागर, दापोली तालुक्यास रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 4 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून आज संचारबंदीची घोषणा. मि-या रोड बोट भगवती बंदरहून भरकटली. शहरातील सर्व भागात शुकशुकाट जेलरोडवर झाड कोसळले. दापोली प्रशासनाने नागरिक स्थलांतर सुरु केले. रत्नागिरी तालुक्यात बागबागायतींचे नुकसान तर शहरालाही ठिकठिकाणी फटका.वेगवान वारा पाऊसाचे प्रमाण कमीजास्त. रत्नागिरी शहरात होर्डिग्ज रस्त्यावर भोके गावातील मायंगडेवाडीमध्ये बालक्रुष्ण मायंगडे यांच्या मालकीचे किराणा दुकान व चिकन सेंन्टर चे वादळी वारयामुळे झाले मोठे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी तालुक्यातील वेगवान वादळाच्या तडाख्याने फणसोप,रीळ उंडी, नांदीवडे गावातील काही घरांचे नुकसान झाले आहे.तर रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर नाणीज येथे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत.पण ताबडतोब झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भोके गावातील मायंगडेवाडी मध्ये बालक्रुष्ण मायंगडे यांच्या मालकीचे किराणा दुकान व चिकन सेंन्टर चे वादळी वारयामुळे झाले मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील गणेशगुळे कुर्धे येथील शिंदे वाडीतील ग्रामस्थ विकास शिंदे यांच्या घरावर झाड पडून घराचे मोठे नुकसान झाले असून दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. बाजूला उभ्या असलेल्या सुरेश शिंदे यांच्या रिक्षा वर ही झाड कोसळल्याने रिक्षा चे नुकसान झाले. करबुडे बौद्धवाडी येथे रस्त्यात झाड कोसळले आहे त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. सुरेश सावंत यांचा वाडा पडला कोणतीही जिवीतहानी नाही.