ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिवंगत माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मकथेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज व्हर्च्युअल पद्धतीने प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली.
मोदी म्हणाले, स्वर्गीय विखे-पाटील यांनी नेहमीच सत्तेतून, राजकारणातून समाजहित साधले. सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यावर भर दिला. त्यांचे कार्य पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहे. विखे पाटलांनी सहकार, जलसंवर्धन आणि ग्रामीण शिक्षणासाठी केलेल्या कार्याचे मोदींनी कौतुक केले.
विखे पाटलांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यामुळेच ते ग्रामीण भागातला चेहरा बनले. त्यांच्या विचारांमुळे ते नेहमी इतरांपासून वेगळे ठरतात. विखेंच्या आत्मचरित्राला देण्यात आलेले ‘देह वेचावा कारणी’ हे नाव अत्यंत समर्पक आहे. विखेंच्याआयुष्याचे संपूर्ण सार या नावात आहे. सत्ता,राजकारणाचा वापर विखेंनी समाजाच्या कल्याणासाठीकेली. देशात कुठेही ग्रामीण शिक्षणाची चर्चा नसतानात्यांनी ग्रामीण शिक्षणासाठी पुढाकार घेतला. अविरतप्रयत्न करत प्रवरा शिक्षण संस्था उभारली. तसेच तरूणांना रोजगार दिला.