ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दलाने शिक्षण, रोजगार आणि शेतीसह अन्य मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवत आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.
‘प्रण हमारा संकल्प बदलाव का’ असे या जाहिरनाम्याला नाव देण्यात आले आहे. या 16 पानी जाहीरनाम्यात 17 मुद्यांना स्थान देण्यात आले आहे. राजद नेते तेजस्वी यादव यांनी पत्रकार घेऊन हा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
राजदची सत्ता आल्यास नवीन संधी उपलब्ध करून 10 लाख तरुणांना नोकरी दिली जाईल. पहिल्याच कॅबिनेट बैठकीत या कामाला गती देण्यात येईल. सर्व विभागातील खासगीकरण बंद करण्यात येईल. तसेच कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करून घेतले जाईल. अंगणवाडी सेविका, ग्रामीण सरकारी रुग्णालयातील आशा वर्कर्स, आरोग्य दूत, सहाय्यक, यांच्या मागण्या मान्य करणे, जिल्हास्तरावर रोजगार निर्मिती केंद्र उभारणार. नव उद्योजकांना संधी देण्यासाठी उद्योग उभारणीस अनुदान दिले जाईल.