उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाने देश हादरला असून विरोधकांनी त्याचे प्रचंड भांडवल करीत केवळ राजकारण सुरू केले आहे. सध्या आपल्या अतिरेकीपणामुळे बदनाम झालेल्या मीडियानेच या राजकारणाचा पर्दाफाश केला आहे हे मात्र विसरता येणार नाही. खरेतर मानवतेवर घाला घालणारी ही गुन्हेगारी प्रवृत्ती केवळ उत्तर प्रदेशपुरती मर्यादित आहे असे नाही. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने 30 सप्टेंबरला जारी केलेल्या अहवालानुसार गेल्या वषी देशभरात 286 महिलांची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. त्यात सर्वाधिक 47 महिला महाराष्ट्रातील होत्या. 2019 मध्ये भारतात बलात्काराच्या घटनात मोठी वाढ झाली असून 30,641 केसेस नोंदवण्यात आल्या आहेत, देशात दर 17 मिनिटांनी बलात्कार होत असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेशात राजकीय फायदा कसा होईल यासाठी विविध प्रकारची नाटके राहुल आणि प्रियांका गांधी करीत आहेत. हसत हसत वातानुकूलित गाडीतून जातानाचा त्यांचा व्हीडिओ समोर आल्याने नाटक उघड
झालेच पण, त्याच उत्तर प्रदेशमध्ये बलरामपूरमध्येसुद्धा बलात्कार झाला होता. परंतु तेथील आरोपी अल्पसंख्याक समाजातील असल्यामुळे व्होटबँकेला धक्का लागू नये याची काळजी घेत तिथे मात्र पीडित महिला दलित समाजातील असूनही त्या परिवाराची राहुल गांधींनी भेट घेतली नाही. काँग्रेसचे हे बेगडी प्रेम दलितांना कळणार नाही का? भीम आर्मी, समाजवादी आणि आपवालेही भेटीगाठी करून प्रायोजित राजकारण करत आहेत. पीडितेबरोबर जे काही झाले ते अमानुष आहेच. पीडित मुलीला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली असती तर तिचे प्राण नक्कीच वाचू शकले असते. पोलिसांनी तिच्याकडे लक्ष दिले नाही. मृत्यूनंतर रात्री अडीच वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार तर केलेच पण अगदी जवळच्या नातेवाईकांना अंत्यदर्शन देखील घेऊ दिले नाही. या चुकांची शिक्षा म्हणून योगी सरकारने संबंधित पोलीस अधिकाऱयांना निलंबित केले आहेच, बलात्कार झाला नाही असे पोस्टमार्टेम रिपोर्ट आणि पहिला एफआयआर सांगतो. आरोपी आणि पीडिता यांच्यामध्ये प्रेमप्रसंग सुरू होते. त्यांच्यामध्ये संभाषण सुरू होते असे मोबाईलच्या मेसेजिंगवरून पुढे आले आहे.
त्या गावातील लोक व आरोपी म्हणतात की मुलीच्या व मुलाच्या घरच्यांचा या संबंधांना विरोध होता. मुलीच्या घरच्या लोकांनीच मुलीला मारले. कुठलाही आरोपी खोटेच बोलतो हे गृहीत धरले तरी पीडितेच्या घरच्यांनी अनेक दिवसांनी व अनेक लोक भेटून गेल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला हेही खरे आहे. शिवाय नार्को टेस्टला पीडित परिवार नकार देत आहे अशा संदिग्धतेमुळे कुठेतरी पाणी मुरते आहे का अशी शंका निर्माण झाली आहे. शिवाय सुशांतसिंग राजपूत केसमध्ये जसे बॉलिवुडमधील ड्रगमाफिया कनेक्शन पुढे आले तसे काही राजकीय पक्ष, देशद्रोही संघटनांचे जातीय दंगली घडवण्याचे षड्यंत्रही असण्याची शक्मयता समोर आली आहे. योगी सरकारने तपासासाठी एसआयटी नेमली. आता तपास सीबीआयने हातात घेतला आहे व तो न्यायालयाच्या अखत्यारीत होणार असल्याने ‘दूध का दूध और पानी का पानी’ लवकरच होणार आहे. योगी सरकारने जी पावले उचलली आहेत त्याकडे राजकीय विरोधक सोयीस्कर दुर्लक्ष करत इतर राज्यातील अशाच गुह्यांबाबत मात्र सोयीस्कर मौन राखले आहे. छत्तीगडमधील पोलीस भ्रष्टाचाराने दाबली गेलेली घटना नुकतीच समोर आली आहे. एका आदिवासी तरुणीवर बलात्कार झाला. हा गंभीर गुन्हा पोलिसांनी केवळ आरोपींकडून दहा हजार रु. घेऊन मिटवून टाकला होता. मीडियाने हे शोधून काढले आणि गुन्हा घडल्यानंतर अडीच महिन्यांनी आरोपींना पकडण्यात आले आहे. इथेही काँग्रेसचे सरकार आहे. काँग्रेस सत्तेत सहभागी असलेल्या महाराष्ट्रात पोलिसांच्या उपस्थितीत शेकडो लोकांच्या जमावाने लाठय़ा काठय़ांनी मारून साधूंची निर्घृण हत्या केली. पीडितांच्या नातेवाईकांनी, राज्यातील जनतेने मागणी करूनही आघाडी सरकारने तपास सीबीआयकडे सोपविला नाही. याच दरम्यान राजस्थानमधील दोन अल्पवयीन बहिणींवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी आधी दोन्ही मुलींना फूस लावून आपल्यासोबत नेले. त्यानंतर तीन दिवस त्यांना वेगवेगळय़ा शहरात नेऊन त्यांच्यावर बलात्कार केले. मीडिया रिपोर्टनुसार आरोपींनी पोलिसांसमोर काही बोलल्यामुळे अल्पवयीन मुलींना जिवे मारण्याची धमकीही दिली.
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी या मुली स्वखुशीने आरोपींबरोबर गेल्या होत्या असे उत्तर यावर दिले आहे. अज्ञान मुलीशी केलेला शरीर संबंध बलात्कार असतो हे मुख्यमंत्रीपदी बसलेल्या काँग्रेसच्या एवढय़ा वरि÷ नेत्याला माहीत नसावे?
राजस्थानमधलीच, ज्यावर राहुल गांधींची काहीही प्रतिक्रिया नसलेली करौली जिह्यातील बुकाणा गावात जमिनीच्या वादातून गरीब पुरोहिताला जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बाबुलाल वैष्णव हे 50 वय असलेले पुजारी देवालयासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या तीन बिघे जमिनीवर शेती करून उदरनिर्वाह करीत होते. या जमिनीवर कैलाश मीना आणि त्याच्या कुटुंबीयांचा डोळा होता. ही गोष्ट पुजाऱयाने गावकऱयांना सांगितली होती व पोलिसांकडून संरक्षणही मागितले होते. आठ ऑक्टोबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास कैलाश मीना आपल्या कुटुंबातील सदस्यांसह आले आणि पुजाऱयाच्या जमिनीवर झोपडी बनवत होते. पुजाऱयाने अडवल्यावर वाद झाला. आरोपींनी पुजाऱयावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे पोलीस अधिकाऱयाने पुजाऱयाने आत्महत्या केल्याची केस दाखल करून केस दाबण्याचा प्रयत्न केला. इथेही मीडिया पुढे आला व आग लावून मारताना पाहिलेले गावकरी मीडियाने शोधले व पोलिसांचा खोटेपणा उघड झाला. एका हिंदू पुजाऱयाला जिवंत जाळण्याची घटना घडूनही हाथरस भेटीसाठी अडून बसलेल्या राहुल गांधींनी साधे ट्विटही केलेले नाही. अशोक गेहलोत यांनी पीडित परिवार व गावकऱयांची 50 लाख रु. मदत व सीबीआय चौकशीची मागणी नाकारली आहे. अशोक गेहलोत समोर राहुल गांधींचे काही चालत नाही की मृत पुजारी हिंदू सवर्ण होता म्हणून राहुल गांधींना या गंभीर प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही? इतर विरोधकही इकडे फिरकलेले नाहीत. हे सिलेक्टिव्ह सहानुभूतीचे राजकारण देशाला कुठे घेऊन जाणार आहे? जनतेनेच अशा बेगडी राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी.
विलास पंढरी