स्वयंचलित दरवाजे खुले होण्याआधीच पूरस्थिती, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
प्रतिनिधी/राधानगरी
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेली दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून धरण 75 टक्के भरले आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी ओढ्यांना पूर आला असून सर्वत्र पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पुराचे पाणी शेतात शिरले आहे. तर जनजीवन विस्कळीत झाले असून पडळी पिरळ दोन्ही पूलं पाण्याखाली गेली असून कारीवडे, राऊतवाडी, कासारवाडी, सावर्धन , कसबा तारळे ,दुर्गमानवड व वाड्या वस्त्या या गावांचा राधानगरीशी संपर्क तुटला आहे. आतापर्यत धरणातील चार स्वयंचलित दरवाजे खुले झालेनंतर या गावांचा संपर्क तुटत होता. मात्र अचानकपणे पाणी वाढल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सकाळी सहापासून दुपारपर्यंत राधानगरी धरण परिसरात विक्रमी पाऊस झाला. गुरुवारी सकाळी सहापासून सायंकाळपर्यंत अवघ्या आठ तासात 212 मिलिमीटर इतका पाऊस झाला. धरणाची पाणी पातळी 335 फूट इतकी असून धरण 347 फूट इतक्या पातळीला पूर्ण क्षमतेने भरते. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास केवळ दहा फूट पाणी पातळी कमी आहे.
आज अखेर एकूण 1906 इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरणातून सध्या खाजगी पॉवर हाऊस मधून 1425 क्युसेकने पाणी विसर्ग सुरू आहे. धरण काठावरील लोकांनी सतर्क राहण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्या आहेत. पावसाचा जोर असाच राहिल्यास जुलैच्या शेवटच्या आठवड्यात धरण पूर्ण क्षमतेने भरेल असा अंदाज येथील पाटबंधारे विभागाचे अधिकारी विवेक सुतार यांनी वर्तवला आहे.
Trending
- Ratnagiri Breaking : जाकादेवी बँक दरोडा प्रकरणात तिघांना जन्मठेप
- सिमेंट- मिक्सर ट्रकची कारला धडक ७ जखमी; जखमींमध्ये महिला लहान मुलांचा समावेश
- कोल्हापूरात होणारा ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी पथदर्शक ठरावा- जिल्हाधिकारी राहुल रेखावार
- गोल्याळी फाट्यानजीक बस -दुचाकीची धडक; चार जण गंभीर जखमी
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६ रोजी हेलिकॉप्टरद्वारे सिंधुदुर्गात !
- दहावीच्या परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी 1 वाजता लागणार निकाल
- को.म सा.प. मालवणचा “माझे आजोळ, माझी देवभूमी” हा उपक्रम संपन्न
- बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा वेत्ये ग्रामपंचायतीकडून गौरव