नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लस उत्सवाचा संदर्भ देत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना “ना टेस्ट आहे, ना हॉस्पिटलमध्ये बेड, ना व्हेन्टिलेटर आहे, ना ऑक्सिजन, कोरोनाची लसही नाही, हे फक्त उत्सवाचे ढोंग आहे’’ असे ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांनंतर 11 एप्रिलपासून 14 एप्रिलपर्यंत देशात ‘लस उत्सव’ साजरा करण्यात आला. त्यानंतर राहुल गांधींनी सरकारला लक्ष्य केले आहे.
संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱया लाटेने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला असतानाच त्यांनी ही टीका केली आहे.