पूरग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची रयत संघटनेची मागणी :
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्यावषी महापुरामुळे शेतकरी अडचणीत आले होते. त्यानंतर आता कोरोनामुळे आणखीनच मोठे संकट कोसळले आहे. महापुरामुळे अनेकांची घरे कोसळली होती. त्यांना अजूनही नुकसानभरपाई देण्यात आली नाही. तेव्हा तातडीने नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ आणि मानव हक्क संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
महापुरामुळे शेतीचे नुकसान आणि घरांची पडझड झाली होती. या घटनेला वर्ष होत आले आहे. तरीदेखील त्यांना अजून नुकसानभरपाई दिली गेली नाही. घर पडलेल्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याऐवजी इतरांनाच नुकसानभरपाई देण्यात आली आहे. तेव्हा त्याचा विचार करावा आणि योग्य व्यक्तींना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. यावेळी गंगाधर दोडमनी व शेतकरी उपस्थित होते.
वेतन देण्यास टाळाटाळ : कामगारांची तक्रार
18 डीआय 6 जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यासाठी उपस्थित असलेले कामगार.
कोरोनामुळे कारखाना बंद पडला म्हणून मालकांनी वेतन दिले नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी जिल्हा प्रशासनाने कारखाना मालकाला सूचना करून आम्हाला वेतन द्यावे, अशी मागणी रफीया पॉलीमर्स पै कंग्राळी बुद्रुकमधील कामगारांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आम्हाला मार्च महिन्याचे वेतन देण्यात आले. मात्र एप्रिल महिन्याचे वेतन दिले नाही. कारखाना सुरू झाल्यानंतर देऊ, असे सांगितले जात आहे. मात्र लॉकडाऊनमुळे कारखाना बंद आहे. तेव्हा आम्हाला जिल्हा प्रशासनानेच मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी कारखान्यात काम करणारे 40 हून अधिक कामगार उपस्थित होते. महिला कामगारांचाही यामध्ये समावेश होता.