कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीमाना दिला आहे.कॉंग्रेसमधला अंतर्गत कलह विकोपाल गेला आहे. दिल्ली हायकमांड काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत खदखद दिसून येऊ लागली आहे. अशातच नाशिक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही घडलं त्यानंतर काँग्रेसमध्ये नेत्याची नाराजी बाहेर दिसू लागली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीवेळी पक्षाने दिलेल्या चुकीच्या एबी फॉर्मवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. याशिवाय बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचेही स्पष्ट केले आहे.
Trending
- राज्यासाठी गोड बातमी : साखर उद्योगाचा व्यवसाय 1.8 लाख कोटीचा
- वेंगुर्लेत पाणी टंचाई असलेल्या भागात तात्काळ पाणी पुरवठ्याचे नियोजन करा- यशवंत परब
- मलकापूर बाजारपेठेत ट्रकचा ब्रेक फेल; प्रसंगावधाने मोठा अनर्थ टळला
- थेटपाईपलाईनच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा -सतेज पाटील
- Kolhapur Municipal Corporation News : धोकादायक 104 इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट
- ग्रामपंचायतमधील माहीती सोशलमीडीयावर टाकल्याने उपसरपंचावर अविश्वास ठराव मंजूर
- नवदांपत्यांकडून हेलिकॉप्टरमधून अंबाबाई, जोतिबा मंदिरावर पुष्पवृष्टी
- Kolhapur Breaking : कोल्हापूरात भरदिवसा तलवार हल्ला; भर चौकात तरुणावर केले सपासप वार