ऑनलाईन टीम / तरुण भारत :
H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे देशाची चिंता वाढली आहे. या विषाणूने देशात दोन जणांचा बळी घेतला असून, आरोग्य प्रशासन आता सतर्क झाले आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन नीती आयोगाने केले आहे.
यापार्श्वभूमीवर नीती आयोगाने कोविड टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य सचिव आणि राज्य आरोग्य अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. सद्यस्थितीत कोरोना रुग्णांमध्ये घट झाली असली तरी देखील कोरोना प्रोटोकॉलचे पालन आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सर्व राज्यांनी आवश्यक तेवढय़ा औषधांचा पुरेशा प्रमाणात साठा ठेऊन लक्षणे असलेल्या रूग्णांचे योग्य तऱ्हेने निरीक्षण करा, असे आदेश केंद्राकडून विविध राज्यांना देण्यात आले आहेत.
हवामानातील बदलांमुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला व जुलाब या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. औषधोपचार नंतरही अनेकांना खोकल्यापासून संपूर्णपणे समाधान होताना दिसत नाही. H3N2 इन्फ्लूएंझाचा वाढता धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्टवर आहे.
अधिक वाचा : स्पीड ब्रेकरवर बस आदळली अन् महिलेचा मोडला मणका