उप-प्रमुख लेफ्टनंट जनरल बीएस राजू
ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
भारतीय सैन्यात येत्या काळात ‘अग्निवीर’ सैनिकांची संख्या वाढणार असून ती जवळजवळ 50 टक्क्यापर्यंत पोहोचून 2030-2032 पर्यंत ती 12 लाख होतील. त्यामुळे भविष्यात युद्धे लढण्यासाठी सैंन्यामध्ये तरुण आणि अनुभवाचा योग्य समतोल साधला जाईल, असे लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांनी बुधवारी सांगितले.
एका मुलाखतीत मध्ये बोलताना, भारतीय लष्कराचे उप मुख्य म्हणले, “या योजनेंतर्गत आम्ही वार्षिक भरती हळूहळू वाढवणार आहोत. या वर्षी 40,000 नोकर्यांची भरती होईल येत्या सात किंवा आठ वर्षापर्यंत ती 1.2 लाखावर वाढवणार आहे. तसेच ती दहाव्या किंवा अकराव्या वर्षी 1.6 लाखांवर जाईल.” पुढे बोलताना ते म्हणाले की, सर्व भरती अग्निपथ योजनेअंतर्गतच केली जाईल तसेच या भरतीमध्ये मोहिम किंवा युद्धाच्या आवश्यकतांनुसार बदल केले जतील.