डॉ. महेश खरात यांचे प्रतिपादन : कोकण मराठी परिषद गोवातर्फे ‘आषाढस्य प्रथम दिवसे ’
पणजी / प्रतिनिधी
कवी अशी सृष्टी,विश्व आणि शब्दांची वलये निर्माण करतो की कोणी तशी कल्पनाच केलेली नसते.आज भरमसाठ कविता लिहिली जात आहे पण कवींना संयम हवा.प्रतिभेचे वेड लागणे हे भाग्याचे लक्षण आहे.
कलावंत घडतांना अनेक हात असतात पाठीमागे तसेंच ओढणारेही हात असतात पाठीमागे ,असे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यकि डॉ.महेश खरात यांनी येथे केले.
कोकण मराठी परिषद गोवाने आयएमबी च्या सहयोगाने आयएमबीच्या सभागृहात आयोजित केलेल्या ’आषाढस्य प्रथम दिवसे’ कार्यक्रमात डॉ. महेश खरात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.
त्यांच्या हस्ते ज्ये÷ कवी माधव सटवाणी यांना कवी कुलगुरू कालिदास पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतीचिन्ह, रोख रक्कम असे त्याचे स्वरूप होते.व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी दशरथ परब (आयएमबीचे अध्यक्ष) संस्थेचे सल्लागार ऍड.रमाकांत खलप, अध्यक्ष सागर जावडेकर, सचिव चित्रा क्षीरसागर, कोषाध्यक्ष अजित नार्वेकर ,नारायण महाले उपस्थित होते.
दशरथ परब यांनी सांगितले की, कालिदासाचे साहित्य क्षेत्रातील कार्य दीपस्तंभासारखे आहे.त्यांचे काव्य पन्नास राष्ट्रात पोचले आहे. त्यांचे साहित्य प्रत्येकाने वाचले पाहिजे.
गेली पन्नास वर्षे मी जी मराठी भाषा आणि साहित्याची सेवा केली आहे त्याची दखल घेऊन कालिदास पुरस्कार दिल्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करून माधव सटवानी म्हणाले, माझ्या शिक्षकामुळे माझ्या मनात कवितेबद्दलचे प्रेम निर्माण झाले.पुढे नरेंद्र बोडके सारखे कविमित्र लाभले आणि मी घडत गेलो.जनाधार वाचकांमुळे मिळतो तेही महत्वाचे आहेत.
यावेळी जयराम अ.रेडकर यांच्या आत्मकथनपर ’एक प्रवास आठवणींचा’ या पुस्तकाचे प्रकाशन दशरथ परब यांच्या हस्ते तर डॉ. गुरुदास नाटेकर यांच्या ’हिरव्या रानात’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. महेश खरात यांच्या हस्ते करण्यात आले. ऍड. खलप यांनी प्रास्ताविकात सांगितले, की मराठी भाषेचे गोव्यात जे अढळ स्थान आहे ते पुन्हा पुन्हा अधोरेखित करावे म्हणून आमचे प्रयत्न आहेत. गोव्यात कायद्याचा आधार असतांना मराठीची उपेक्षा केली जात आहे. शेकडो वर्षांची मराठीची परंपरा टिकावी, नवनवे साहित्यकि निर्माण व्हावेत व शासनाने त्याची नोंद घ्यावी म्हणून आमचे उपक्रम आहेत. साहित्य अकादमीचा पुरस्कार गोव्यातील मराठी साहित्यकांना लाभत नाहीत ही खंत आहे परंतु त्यामुळे इथल्या मराठी सात्यकांच्या लेखनाचे महत्व कमी झालेले नाही. सागर जावडेकर यांनी स्वागत केले.नारायण महाले यांनी मानपत्राचे वाचन केले. चित्रा क्षीरसागर यांनी डॉ.खरात यांचा परिचय करून दिला .पौर्णिमा केरकर यांनी सूत्रसंचालन केले. उर्वीजा महेश नागवेकर हिने गायिलेल्या गणेशवंदनेने सोहळय़ाला प्रारंभ झाला.