मच्छीमार बांधवांचे अथांग सागराला गाऱहाणे
प्रतिनिधी/ रत्नागिरी
‘हे दर्याराजा…शांत हो’…आणि आमच्यावर कृपादृष्टी ठेव! असे गाऱहाणे घालत सोमवारी रत्नागिरीतील मांडवी समुद्र किनाऱयासह जिल्हाभरातील मच्छीमार बांधवांनी नारळी पौर्णिमेनिमित्त समुद्र देवतेला गाऱहाणे घातले. समुद्राचे पूजन करत श्रीफळ अर्पण करण्यात आले. मात्र यावर्षीच्या उत्सवावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे नागरिकांचा उत्साह, गर्दी, यांचा अभाव होता.
समुद्राकाठी रहाणाऱया व प्रामुख्याने मासेमारी करणाऱया कोळी, मच्छीमार लोकांचा नारळी पौर्णिमा हा महत्त्वाचा सण. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी मच्छिमार बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अथवा नारळ अर्पण करत असतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात.
श्रावणातील ही पौर्णिमा ही समुद्र किनाऱयालगत राहणाऱया लोकांना मोठी आनंदाची असते. खवळलेला समुद्र शांत होतो, पावसाचा जोर ओसरतो व मच्छिमार बांधव खऱया अर्थाने मासेमारीस प्रारंभ करतात. समुद्रात जाणाऱया या मच्छीमारांच्या सुरक्षिततेची काळजी समुद्र देवतेनच घ्यावी अशी प्रार्थना केली जाते. या सणाला नारळाचे गोड पदार्थ केले जातात. यावेळी देखील प्रतिवर्षाप्रमाणे सागराला सर्व मच्छीमारांनी साद घातली. ’दर्याराजा शांत हो आणि आमचे रक्षण करं! यंदाच्या मौसमात चांगली मच्छी मिळून आमची भरभराट कर’, अशी प्रार्थना या नारळी पोर्णिमेला करण्यात आली.
रत्नागिरीतील मांडवी किनारी दरवर्षी यादिवशी सायंकाळी गर्दी होते. पण यावषर्षी कोरोना महामारीने त्या उत्साहावर विरजण पडलेले दिसून आले. किनारपट्टीवर राहणाऱया नागरिकांनी खवळलेल्या समुद्राला श्रीफळ अर्पण करत शांत हो अशी प्रार्थना केली. सीमाशुल्क विभागाच्या वतीने उपयुक्त अमित नायक यांनी सोमवारी सागराला श्रीफळ अर्पण केले. रत्नागिरी पोलीस दलाच्यावतीने येथील मांडवी समुद्रकिनारी श्रीफळ अर्पण करण्यात आले.