सर्वसामान्य जनतेतून तीव्र नाराजी : तालुक्मयातील प्रकारामुळे तीव्र संताप
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी साऱयांचीच धडपड सुरू आहे. शहराबरोबरच तालुक्मयामध्येही कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. नियोजनाचा अभाव आणि लोकप्रतिनिधींचा अधिकाऱयांवर असलेला दबाव यामुळे जनता भरडली जात आहे. पहाटे 3 पासून लसीसाठी रांगा लावण्यात येत आहेत. ही खरोखरच दुर्दैवाची गोष्ट असल्याचे मत तालुक्मयातील सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारने सर्वांना मोफत लस देण्याचे जाहीर केले. त्यानुसार प्रत्येक राज्याला कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा पाठविण्यात येत आहे. त्यानुसार राज्य प्रत्येक जिल्हय़ाला लस पाठवत आहे. जिल्हा आरोग्याधिकाऱयांनी योग्यप्रकारे वितरण करणे गरजेचे आहे. मात्र राजकीय दबावामुळे काही तालुक्मयांमध्ये अधिक लस पुरवठा केला जात आहे तर काही ठिकाणी कमी पुरवठा होत आहे.
महत्त्वाचे म्हणजे लस उपलब्ध असली तरी लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे जिल्हय़ातील बहुसंख्य तालुक्मयांतील सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. बेळगाव तालुक्मयातील जनतेलाही मोठा त्रास सहन करावा लागत असून यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. केवळ राज्य आणि केंद्र सरकार यांच्याबद्दलच नाराजी नाही तर लोकप्रतिनिधींचा ज्याप्रकारे हस्तक्षेप सुरू आहे त्याबद्दल सर्वच मतदारसंघातून नाराजी व्यक्त होत आहे.
लोकप्रतिनिधींचे समर्थक फॉर्म भरून एखादी चिठ्ठी हातात देऊन लस देत आहेत. वास्तविक याची काहीच गरज नाही. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामधून ही लस उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र आपल्या सोयीनुसार तसेच आपल्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार हवी त्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे श्रेय कोणत्या कामाचे लाटायचे हे देखील माहिती नाही का, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
कोरोनासारख्या महाभयानक महामारीशी सर्वसामान्य जनता तोंड देत आहे. प्रत्येक जण आपला जीव वाचावा यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र सर्वसामान्य जनतेच्या या त्रासाचे सोयरसुतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.
लोकप्रतिनिधी जणू स्वतःच्या खिशातूनच लस देत आहेत का?
अनेक ठिकाणी फलकांची उभारणी केली जात आहे. लोकांच्या हातामध्ये चिठ्ठय़ा दिल्या जात आहेत. ती चिठ्ठी दाखविल्यानंतरच लस दिली जात आहे. लोकप्रतिनिधी जणू स्वतःच्या खिशातूनच लस देत आहेत का? असा प्रश्न सर्वसामान्य जनता उपस्थित करत आहे. महाराष्ट्रातील आमदार निलेश लंके यांनी कोरोनाकाळात स्वतःचा जीव धोक्मयात घालून सर्वसामान्य जनतेचे जीव वाचविले. त्या व्यक्तीने हिमालयाएवढे काम केले. तरीदेखील कधी बडेजाव केला नाही. मात्र सरकारच्याच पैशातून खरेदी केलेल्या लसीच्या वितरणामध्ये आपला लाभ शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. मात्र जनता त्यांच्यापेक्षाही शहाणी असून वेगवेगळय़ा प्रकारे चर्चा करून जणू त्यांची खरी ओळख करून देत असल्याचे यावरून दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लस घेण्याचे आवाहन करत आहेत. मात्र लस उपलब्ध नाहीत. याबद्दल कोणीच आवाज उठवत नाहीत. वास्तविक जनतेचा एवढा कळकळा असेल तर स्वतः लस खरेदी करून सर्वसामान्य जनतेला देण्यासाठी प्रयत्न करावेत. असे कोणीही केले तर त्याचा निश्चितच आम्ही आदर करू. मात्र सरकारच्या लसीवर तुमचे राजकारण होत असेल तर हे राजकारण योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.