बावधनच्या श्रेयसने वडिलांचा मार वाचवण्यासाठी रचली भन्नाट कथा
प्रतिनिधी / सातारा
बुधवारी सकाळी वाई तालुक्यामध्ये एकच चर्चा होती. ती म्हणजे बावधन गावात दरोडय़ाचा प्रयत्न. लहानग्या श्रेयसचे धाडस. दरोडेखोर बोलेरोतून पळाले, सावधान असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बावधनकरांसह वाई तालुक्यात चर्चाच सुरु होती. परंतु वाई पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जात इयत्ता पाचवीतील लहानग्या श्रेयसशी गोड बोलून प्रेमाने विचारपुस केली असता खरा प्रकार समोर आला तो म्हणजे आजींचा मोबाईल हरवल्याने आजीने त्याला मारहाण केली होती. मोबाईल शोधण्यासाठी सगळय़ा घरात शोध मोहिम करताना साहित्य अस्ताव्यस्त झाल्याने वडिल मारहाण करतील या भितीपोटी त्याने शेजाऱयांना, वडिलांना घरात चोर आल्याचे सांगितले.
बुधवारी वाई तालुक्यातील बावधनमध्ये दरोडे खोर आल्याची सोशल मीडियावर चांगलीच पोस्ट व्हायरल झाली. सकाळी 10 वाजताची घटना घडताच दुपारपर्यंत तालुक्याच्या प्रत्येक गावातल्या सोशल मीडियावर पोस्ट फिरत असल्याने पोस्टमधील दरोडेखोरांची गाडी कोणत्या दिशेने गेली असेल त्याचा अंदाज व नुसती चर्चा जिकडे तिकडे सुरु होती. त्याच अनुषंगाने वाई पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी या प्रकरणाची माहिती घेण्याचे काम सुरु केले. तेव्हा त्यांना खरी माहिती समोर आली अन् 11 वर्षाच्या श्रेयसने सुरुवातीला रचलेली स्टोरी पाहून सगळेच अचंबित झाले. ती स्टोरी म्हणजे त्याची आई निर्मला या रानात गेल्या होत्या. तर श्रेयस घरात एकटाच होता. आतून खिडक्या, दारे बंद करुन बसला होता. एका माणसाने बाहेरुन दरवाजा वाजवला. श्रेयसने खिडकीतून काय पाहिजे असे विचारले असता काकाला डबा दे असा म्हणताच श्रेयसने दरवाजा उघडताच तो माणूस आतमध्ये धक्का देवून आला.
त्याच्यासह तीनजण व एक मुलगा आत आला. एकाने तोंड दाबून बुक्या मारल्या व लॉकरची चावी मागीतली. त्यांना नाही म्हणून श्रेयसने सांगितले. तेव्हा एकाने घरातील कपाट, पेटय़ा, डबे उचकटले. दुसऱयाने श्रेयसला पकडून भुलीचे इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा श्रेयसने त्यास लाथ मारताच भुलीचे इंजेकशन त्याच्याच दंडात घुसले व तो खाली पडला. त्याचाच फायदा घेत श्रेयस बाहेर पडला. श्रेयस बाहेर पडताच ते लोक पडलेल्या साथीदाराला घेवून मागच्या दाराने पळून गेले. रस्त्यावर बोलेरोसारखी गाडी उभी होती. श्रेयसने हा प्रकार ओरडत शेजाऱयांना सांगितला अन् वडिलांना फोन करुन माहिती दिली. त्याचे वडिलही घरी आले, असे त्यांने सांगितले होते. वाई पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर श्रेयस खोट बोलत आहे, असा अंदाज बांधला त्यावरुन त्यांनी त्यास प्रेमाने विचारले असता त्याने खरा प्रकार सांगितला तो म्हणजे आज सकाळी आई बाबा कामावर गेल्यानंतर आजीने तिचा मोबाईल सापडत नव्हता म्हणून श्रेयसनेच मोबाईल् घेतला आहे असे समजून त्याला आजीने चप्पलने मारले अन् आजी रानात निघून गेली. श्रेयसने आजीचा मोबाईल शोधण्यासाठी जी घरात शोधाशोध केली. त्यामध्ये कपाटातील साडय़ा खाली पडल्या, पेटी वरुन पडली.
धान्याचे डबे खाली पडले. एका डब्यात मोबाईल सापडला. परंतु घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याने आईबाबा परत घरी आल्यानंतर अस्ताव्यस्त पडलेले साहित्य पाहून मारतील या भीतीपोटी घरात चोरी झाली ओ, असे श्रेयसने बाबांना फोन करुन खोटे सांगितले. या घडलेल्या प्रकाराबाबत वडिल हणमंत पिसाळ यांनी श्रेयसमुळे वाई पोलिसांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागीतली. या घटनेची उकल वाईच्या उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, कृष्णराज पवार, पोलीस नाईक प्रशांत शिंदे, पो. कॉ. सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड यांनी सहभाग घेतला होता.