प्रतिनिधी/ चिकोडी
अपघात झाल्यानंतर त्यावेळी जखमीला प्रथमोपचार देण्याची नितांत गरज असते. प्रथमोपचार दिल्यास जखमीचे प्राण वाचण्याची मोठी शक्मयता असते. त्यासाठी सर्वांनी प्रथमोपचाराची माहिती घ्यावी, असे आवाहन येथील सार्वजनिक रुग्णालयाचे डॉ. विवेक होन्नळ्ळी यांनी केले. येथील अग्निशमन खात्याच्यावतीने आयोजित केलेल्या प्राथमिक उपचार कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. होन्नळ्ळी पुढे म्हणाले, अग्निशमन खात्याच्या जवानांना सतत धाडसी व धोक्मयाची कामे करावी लागतात. त्यामुळे त्यांना अपघात, दुखापत होण्याची शक्मयता असते. आपल्या सहकाऱयांचा अशाप्रकारचा अपघात घडल्यास त्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येकाला प्रथमोपचाराची माहिती असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अग्निशमनचे ठाणाधिकारी विजयकुमार बडिगेर, श्रीनिवास नाईक, कर्मचारी टी. बी. परीट, देव दानम्मा, गणपती कोळी, मनोहर बिळीमरी, विजय कांबळे, महांतेश कोरे, अण्णासाहेब जैनापुरे, रोहित राठोड आदी उपस्थित होते.