सुशांत कुरंगी / बेळगाव
मानवी रक्तासाठी आसुसलेला बिबटय़ा, आतापर्यंत 12 लोकांना त्याने आपले भक्ष्य बनविले होते… त्यामुळे हा बिबटय़ा पकडण्यासाठी वन विभाग तसेच महाराष्ट्र सरकार जीवाचे रान करीत होते. सोलापूर जिल्हय़ात या बिबटय़ाची दहशत सुरू होती. रोज एका माणसाला किंवा जनावराला तो आपले भक्ष्य बनवित असल्यामुळे संपूर्ण जिल्हा भयभित झाला होता. एका क्षणाचीही चूक झाल्यास ती चूक आयुष्यावर बेतणार होती. शार्प शूटर्सने अचूक नेम लावत त्या नरभक्षक बिबटय़ाला ठार केले. एका सुंदर वन्य जीवाला मारल्याचे दु:खही होते आणि दुसरीकडे ज्यांचे नातेवाईक या बिबटय़ाने भक्ष्य बनविले त्यांच्या डोळय़ातील आनंद देखील पाहता आला. सहा दिवसांचा थरार बेळगावचे निसर्गप्रेमी समीर जोशी यांनी जवळून अनुभवला.
टिळकवाडी येथे राहणाऱया समीर जोशी यांना लहानपणापासून निसर्गाची एक वेगळी ओढ होती. लोंढा येथे असणाऱया शेतीमुळे त्यांचा वन्यजीवांशी जवळचा संबंध आला. फाररींगची आवड असल्याने त्यांचा संपर्क महाराष्ट्रातील शार्पशुटर्सच्या संघाशी मागील अनेक वर्षांपासून होत होता. सोलापूर जिल्हय़ात नरभक्षक बिबटय़ाने हैदोस घातल्याने महाराष्ट्र वनविभागाने शार्पसुटर्सची मदत घेण्याची ठरविले. यासाठी पुणे येथील एक टीम व सोलापूर येथील धवलसिंग मोहिते- पाटील यांची एक टीम तयार करण्यात आली. बारामती येथील हर्षवर्धन तावरे यांच्या आग्रहाखातर समीर जोशी हे बेळगाववरून या धवलसिंग यांच्या टीममध्ये सहभागी झाले.
केळीच्या बागेत घडला थरार
पहिले दोन दिवस अकलूज राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तेथूनच येवून जावून बिबटय़ाचा शोध घेण्यात येत होता. परंतु त्यानंतर 4 दिवस शेतामध्ये मचानावर रात्री घालवावी लागली. कोणीही बिबटय़ा दिवसल्याचे सांगताच त्याचा माग घेण्यात येत होता. अखेर बिटरगावजवळील केळय़ाच्या शेतात बिबटय़ा असल्याचे समजले. चारही बाजूंनी बिबटय़ाला वेढण्यात आले. अखेर धवलसिंग मोहिते – पाटलांनी त्याला गोळय़ा घालून ठार केले.
एक चूकही जीवावर बेतणारी
हा नरभक्षक बिबटय़ा बिड जिल्हय़ापासून मनुष्य व पाळीव जनावरांचे जीव घेत सोलापूर पर्यंत पोहचला होता. उजनी धरणाच्या परिसरात बिटरगाव परिसरात बिबटय़ा ठाण मांडून होता. त्याचा पायाचे ठसे केळीच्या बागेत व उसाच्या फडात दिसून आले. परंतु मोठमोठी शेती असल्याने ते घेतानाही खबरदारी घ्यावी लागत होती. वाकून ठसे घेताना बिबटय़ा हल्ला करण्याची सर्वांधिक शक्मयता असल्याने शुटर्स बाजून थांबून ठसे घेतले जात होते. यातून एक लहानशी चूकही जीवावर बेतणारी ठरणारी ठरणार होती.
बिबटय़ा नरभक्षक का झाला?
बिबटय़ाला ठार केल्यानंतर तो नरभक्षक का झाला? याच्या उत्तरासाठी शवविच्छेदन अहवाल मागविण्यात आला आहे. परंतु तो बिबटय़ा दुवावला, त्याला मनुष्याने पळवून लावण्यासाठी केलेले उपाय, शारीरिक व्यंग, मादीची शिकार, पिल्लांची शिकार अशा अनेक कारणे असू शकतात. बिबटय़ाने केलेल्या हल्लाचे प्रकार पाहता ते सुडानेच केल्याचे दिसून येत होते. तो मनुष्यावर हल्ला केल्यानंतर त्यांना मृतदेह पूर्णपणे फाडून छिन्नविछिन्न स्थितीत टाकत असल्याचे दिसून आल्याने जोशी यांनी सांगितले.