प्रतिनिधी / कोल्हापूर
अडुरे ता. चंदगड येथील १६ एप्रिल रोजी नादुरुस्त झालेले रोहित्र बदलून कृषीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असून, लॉकडाऊनमुळे वाहन मिळत नसल्याने सदर रोहित्र बदलण्यास विलंब झाल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
अडुरे येथील ‘देशपांडे डीपी’त १६ एप्रिल रोजी किरकोळ बिघाड झाल्याचे स्थानिक कर्मचाऱ्यांना आढळून आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांचे स्तरावर रोहित्रामध्ये ऑईल भरुन ते सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे रोहित्र कायमस्वरुपी निकामी झाल्याचे १८ एप्रिल रोजी स्पष्ट झाले. मात्र, लॉकडाऊनमुळे त्याठिकाणी नवीन रोहित्र बसविण्याकरिता वाहन उपलब्ध होत नव्हते. आज दि. २९ एप्रिल रोजी वाहन उपलब्ध होताच नवीन रोहित्र बसवून संबंधित कृषीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.