खानापूर, हुक्केरी तालुक्मयांना दिल्या भेटी
प्रतिनिधी /बेळगाव
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक रविवारी बेळगाव जिल्हा दौऱयावर आले आहे. खानापूर, गोकाक, हुक्केरी आदी तालुक्मयांना भेटी देऊन या पथकाने नुकसानीची पाहणी केली असून लवकरच केंद्र सरकारला अहवाल देण्यात येणार आहे.
रविवारी सकाळी सुशील पाल यांच्या नेतृत्वाखालील पथकाचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी स्वागत केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाबरोबर बैठक घेऊन त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला. अधिकाऱयांशी चर्चा केली. अतिवृष्टीमुळे झालेली पीकहानी, रस्त्यांची वाताहात, पुलांची हानी, घरे व शाळा इमारतींची पडझड याविषयी जिल्हाधिकाऱयांनी पथकातील अधिकाऱयांना छायाचित्रांसह माहिती दिली.
केंद्रीय पथकातील कृषी खात्याचे संचालक डॉ. के. मनोहर, इंधन खात्याचे शुभम गर्ग, कर्नाटक राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणाचे आयुक्त मनोज रंजन आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱयांच्या बैठकीनंतर पथकातील अधिकाऱयांनी खानापूरला भेट दिली. त्यानंतर हुक्केरी तालुक्मयालाही भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.
हुक्केरीजवळील होळेम्मा देवस्थानच्या आवारात केंद्रीय पथकातील अधिकाऱयांनी छायाचित्र प्रदर्शनाची पाहणी केली. यरनाळ, इस्लामपूर, सुलतानपूर, हरगापूर, गुडस-हुल्लोळी रस्ते, प्राथमिक आरोग्य केंदे आदींच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुशील पाल म्हणाले, लवकरच केंद्र सरकारला संपूर्ण अहवाल दिला जाणार आहे. सरकारी मार्गसूचीनुसार मदत मंजूर करण्यासाठी हा अहवाल मदतीचा ठरणार आहे.
यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर, शशिधर बगली, कृषी खात्याचे शिवनगौडा पाटील, पशुसंगोपन खात्याचे डॉ. कोळ्ळा, खानापूर व हुक्केरी तहसीलदार उपस्थित होते.