लॉकडाऊन शिथील मात्र संचारबंदीत सवलत नाही : तहसीलदारांची माहिती
प्रतिनिधी / कणकवली:
लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतर आता पावसाळय़ापूर्वीची अत्यावश्यक कामे करण्यासाठी सशर्थ मुभा असणार आहे. मात्र, संचारबंदीत कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. यात गौणखनिजांची वाहतूक पास असणाऱया वाहनातून करता येणार आहे. बांधकामविषयक साहित्य वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी घेऊन वाहतूक करता येणार आहे. मात्र, हे करताना सोशल डिस्टंन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असल्याची माहिती तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिली.
20 एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली असली, तरीही संचारबंदी लागू आहे. त्यामुळे लोकांना फिरण्यासंदर्भातील नियमांत कोणतीही सवलत नाही. अशास्थितीत पावसाळय़ापूर्वी पूर्ण करायची अत्यावश्यक कामे करण्यासंदर्भात काही सुट देण्यात आली आहे. यात ग्रामीण भागातील घर दुरुस्तीची किंवा पुनर्बांधणीची कामे करता येणार आहेत. घर दुरुस्तीसाठीच्या अत्यावश्यक साहित्याची ने-आण करणेही शक्य आहे. घर दुरुस्ती, विहिरी, अत्यावश्यक कामे यासाठी पास घेऊनच वाहतूक करता येणार आहे. हे गौणखनिज वाहतुकीसाठी पास असणे बंधनकारक आहे.
घरांच्या व इतर बांधकाम साहित्याची ने-आण करण्यासाठी अत्यावश्यक परवानगी घेऊन संबंधित दुकानदारांना तेवढय़ापुरते दुकान उघडून हे साहित्य देण्याची मुभा देण्यात आली असल्याचे पवार यांनी सांगितले. ठेकेदारांच्या पातळीवर होणाऱया कामांबाबतही कामगारांची यादी तहसीलदारांकडे कळवायची आहे. त्यांना ठेकेदारांनी ओळखपत्रे देऊन कामे करायची आहेत. ही कामे करताना सोशल डिस्टंन्सिंग, आवश्यक मास्क व सॅनिटायझर यांचा वापर करणे, तशी साईटवर तरतूद करण्याची गरज असल्याचेही पवार यांनी सांगितले. a;d=vD(d);var q=d.length;l(m.i,q);if(e)if(null!=this.i)JD(this,a,b,c,d);else{for(b=q;b