‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल : काम सुरू झाल्याने नागरिकांनी व्यक्त केले समाधान
प्रतिनिधी / बेळगाव
अनगोळ काळा तलाव ते जे. जे. पाटील यांच्या गोडाऊनपर्यंतच्या रस्त्याचे काम गेल्या एक महिन्याहून अधिक काळ बंद पडले होते. एक महिन्यांपूर्वी या रस्त्यावर खडी टाकून रस्ता कामाला सुरुवात करण्यात आली होती. पण त्यानंतर या कामाकडे दुर्लक्ष केले गेले होते. त्यामुळे रस्त्यावरून वाहने चालविणे धोकादायक झाले होते. या संदर्भात ‘तरुण भारत’मधून बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन अखेर या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत
आहे.
या रस्त्यावरून शेतकरी बांधवांना ये-जा करताना मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. तसेच वाहनचालकांना रस्त्यावरून वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत होती. या रस्त्यावरून वाहन चालविताना अनेक वाहनचालक घसरून पडत होते. त्यामुळे त्यांना दुखापतीचा सामना करावा लागत होता. याबाबत बातमी प्रसिद्ध होताच कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच नागरिकांनी तरुण भारतचे आभार मानले आहे.