प्रतिनिधी / बेळगाव
अनगोळ नाक्मयापासून मुख्य मार्गावरील पथदीप मागील काही दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे स्थानिकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. पथदीप बंद असल्याने रहिवाशांना अनेक समस्यांना तेंड द्यावे लागत असल्याने पथदीप लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
सध्या लॉकडाऊन असल्याने वर्दळ कमी प्रमाणात आहे. परंतु यामुळे पथदीप बंद ठेवून चालणार आहेत का? अनगोळ मुख्य मार्गावरील पथदीप बंद असल्याने संपूर्ण परिसरात अंधार पसरला आहे. मनपाचा स्वतंत्र विभाग असतानाही पथदीप विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
शहराच्या इतर भागातही पथदीप बंद असल्याने नागरिकांना समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे मनपा तसेच स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.