प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळय़ांचे जगणे कठीण झाले आहे. अशा कठीण काळात दैनंदिन जगण्यावर मर्यादा आल्या आहेत. याला रानोमाळ फिरणारा मेंढपाळ (धनगर) समाजदेखील अपवाद नाही. लॉकडाऊन, अवकाळी पाऊस यामुळे मेंढपाळ आपल्या शेळय़ा-मेंढय़ांसह एकाच ठिकाणी बसून आहेत. त्यामुळे शेळय़ा-मेंढय़ांच्या चाऱयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, ही परिस्थिती लवकरच बदलेल आणि शेळय़ा-मेंढय़ांच्या चाऱयासाठी सुरळीत फिरता येईल, अशी आशा त्यांच्या चेहऱयावर दिसून येत आहे.
संसर्गजन्य रोगाने थैमान घातल्याने अनेक गावात स्वयंस्फूर्तीने कडक लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे. काही गावात प्रवेशबंदी तर काही गावातील संपर्क रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे मेंढपाळांची भटकंती खडतर बनली आहे. परिणामी व्यवसायाची गती मंदावल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. मेंढपाळांना चाऱयासाठी बकऱयांना घेऊन एका गावातून दुसऱया गावात पायपीट करावी लागते. मात्र, लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील काही गावचे संपर्क रस्ते बंद केल्याने मेंढपाळांना एकाच शिवारात पडून राहावे लागत आहे. शिवाय मनात कोरोनाची भीती असल्याने भटकंतीदेखील थांबली आहे. रानोमाळ शेळय़ा-मेंढय़ा घेऊन फिरणे यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, शेळय़ा-मेंढय़ांना चारण्यासाठी होणारी भटकंती थांबल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
एप्रिल व मे महिन्यात शेतकरी शिवारात शेणखतासाठी बकरी बसवून घेतात. त्यामुळे मेंढपाळांना थोडय़ाफार प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र, कोरोनाने थैमान घातल्याने बकरी बसविणे शक्मय झाले नाही. त्यामुळे आर्थिक उत्पन्नाचा स्रोत थांबला आहे. त्यामुळे संकटकाळात मेंढपाळ व्यवसायाकडे शासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
बकरी चारण्यासाठी कोठे जायचे?
लॉकडाऊनमुळे संपर्क रस्ते बंद आहेत. शिवाय महाराष्ट्रात जायचे म्हटले तर सीमा हद्दीवर पोलीस बंदोबस्त असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे बकरी चारण्यासाठी कोठे जायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. कुटुंबाचा मेंढीपालन हा मुख्य व्यवसाय आहे. यावर उदरनिर्वाह चालतो. त्यातच सध्या अवकाळी पाऊस अधिक प्रमाणात झाल्याने अडचणी वाढल्या आहेत.
– गिराप्पा कुरबर (काकती)