ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे देशमुख यांचा तरूंगातील मुक्काम वाढणार आहे.
अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. या प्रकरणात ईडीने देशमुख यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. ईडीने दाखल केलेल्या 5,000 पानी पुरवणी आरोपपत्रानंतर अनिल देशमुखांनी विशेष पीएमएलए कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावनी झाली. यावेळी न्यायालयाने देशमुख यांचा जामीन फेटाळून लावला.