मंत्रिमंडळ विस्तार किंवा पुनर्रचनेला परवानगी मिळविण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे सोमवारी दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत. ते दिल्लीतून परतल्यावर विस्ताराला गती मिळण्याची शक्यता सांगितली जात आहे.
गेल्या आठवडाभरात कर्नाटकातील राजकीय घडामोडी गतीमान झाल्या आहेत. माजी केंद्रीयमंत्री व काँग्रेसचे विधान परिषद सदस्य सी. एम. इब्राहिम यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे जाहीर केले आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावर त्यांचा डोळा होता, पक्षाने हे पद बी. के. हरिप्रसाद यांना दिल्यानंतर विनाविलंब पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा त्यांनी केली आहे. यापाठोपाठ वेगवेगळय़ा पक्षांच्या राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेत इब्राहिम यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. सोमवार दि. 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन दिवशी आपण काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार, असे त्यांनी जाहीर केले आहे. त्याचदिवशी आपली पुढील राजकीय वाटचाल ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. कर्नाटकाचे राजकारण एका विशिष्ट आणि विचित्र वळणावर येऊन ठेपले आहे. सर्वच पक्षांत अंतर्गत धूसफूस सुरू झाली आहे.
मंत्रिमंडळ विस्तार किंवा पुनर्रचनेला परवानगी मिळविण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे सोमवारी दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत. मंत्री बी. श्रीरामुलू यांनी आपले जीवलग मित्र जनार्दन रेड्डी यांना पुन्हा सक्रिय राजकारणात आणण्यासाठी दिल्लीत तळ ठोकला आहे. भाजपच्या व्यासपीठावरून जनार्दन रेड्डी यांचा नवा प्रयोग सुरू करण्यासाठी त्यांनी परवानगी मागितली असली तरी हजारो कोटी रुपयांच्या खाण घोटाळय़ात जनार्दन रेड्डी प्रमुख आरोपी आहेत. सध्या ते जामिनावर आहेत. या आरोपातून ते अद्याप मुक्त झालेले नाहीत. त्यामुळे एरव्ही भ्रष्टाचाराविरुद्ध भूमिका घेणाऱया भाजप नेतृत्वाची यासाठी परवानगी मिळेल, असे वाटत नाही. तरीही श्रीरामुलू यांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. माजी मंत्री रेणुकाचार्य यांनी बसवराज बोम्माई मंत्रिमंडळातील पंधरा निष्क्रिय मंत्र्यांना त्वरित बदला, अशी मागणी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे.
काही मंत्री निर्ढावलेले आहेत. ते आमदारांचेही फोन स्वीकारत नाहीत. ज्या आमदारांमुळे आपल्याला मंत्रिपद मिळाले आहे, त्यांचे फोन घेण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविले नाही. त्यामुळे अशा निष्क्रिय मंत्र्यांना बदला, अशी मागणी रेणुकाचार्यांनी केली आहे. माजी केंद्रीयमंत्री व विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांचे घणाघातही सुरूच आहे. मंत्रिमंडळ विस्तार होणार की पुनर्रचना, हे आपल्याला माहीत नाही. जे काही होणार ते गुढीपाडव्यापर्यंत निश्चितच होणार आहे. कर्नाटकात येडियुराप्पा पर्व संपले, भाजपचे नेते कर्नाटकात नव्या नेतृत्वाच्या शोधात आहेत, असे सांगणारे बसनगौडा स्वतः मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनीही मंत्रिमंडळात पुन्हा आपली वर्णी लागावी यासाठी धडपड सुरूच ठेवली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ते हायकमांडवर दबाव आणत आहेत. मात्र, सीडी प्रकरणातून तेही अद्याप आरोपमुक्त झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावाला हायकमांड होकार देणार का? हा मोठा प्रश्न आहे. भाजप नेतृत्वासमोर असे अनेक जटील निवाडे उभे आहेत.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखालीच आगामी निवडणुका लढविल्या जातील, असे वारंवार जाहीर केले जात असले तरी केंद्रीयमंत्री शोभा करंदलाजे यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. चढाओढीच्या राजकारणात एखादी स्त्राr प्रतिमा मुख्यमंत्र्यांच्या रूपाने जनतेसमोर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार या दोन नेत्यांमधील दरी वाढत चालली आहे. निजदमधून अनेक आमदार बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. आगामी निवडणुकीच्या आधी मोठय़ा प्रमाणात पक्षांतराची शक्मयता आहे. याबरोबरच कर्नाटकाच्या राजकीय आखाडय़ात एक नवा प्रयोग होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपची घोडदौड रोखण्यासाठी कर्नाटकात आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी कर्नाटकातील अनेक नेत्यांशी चर्चाही केली आहे. त्यांचा डोळा बी. एस. येडियुराप्पा यांच्यावर आहे. भाजपने मुख्यमंत्रीपदावरून त्यांना पायउतार केल्यानंतर येडियुराप्पा सध्या घडणाऱया घडामोडींवर दुरूनच लक्ष ठेवून आहेत. त्यांचे चिरंजीव बी. वाय. विजयेंद्र यांना मंत्रिपद देण्यासाठी पक्षावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे त्यांचा दबाव आहे. आगामी विस्तारात आपल्या चिरंजीवाला मंत्रिपद मिळाले नाही तर त्यांची नाराजी आणखी वाढणार आहे. नाराज येडियुराप्पांना भाजपमधून बाहेर काढून पुन्हा नव्या पक्षाचा प्रयोग का करू नये? असा विचार तृणमूलच्या डोक्मयात पिंगा घालत आहे. तूर्त तरी येडियुराप्पा या विचारांना प्रतिसाद देत नसले तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत आणखी एका नव्या पक्षाचा उदय होणार का? हे पहावे लागणार आहे.
मंत्रिमंडळाची पुनर्रचना किंवा विस्तारानंतर भाजपमधील असंतुष्टांची संख्या वाढणार आहे. साहजिकच पक्षांतर करण्याचे ठरविले तर हे नेते काँग्रेसच्या डेऱयात दाखल होतील, अशी अपेक्षा आहे. सी. एम. इब्राहिम यांनी तर लिंगायत, वक्कलिगा आणि अल्पसंख्याक असा नवा प्रयोग डोक्मयात घेऊन नव्या राजकीय समीकरणांची मांडणी केली आहे. माजी मुख्यमंत्री व निजद नेते कुमारस्वामी यांनी इब्राहिम यांना निजदमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. निजद, समाजवादी किंवा तृणमूल या पक्षांत प्रवेश करण्याचे पर्याय आपल्यासाठी खुले आहेत, असे सी. एम. इब्राहिम यांनी सांगितले असले तरी निजदच्या माध्यमातून ते नवा राजकीय प्रयोग करणार की नव्या राजकीय पक्षालाच जन्माला घालणार, हे येत्या आठवडाभरात ठरणार आहे. पालकमंत्री पदावरून सत्ताधारी भाजपमध्ये सुरू असलेली धुसफूस वाढली आहे. मंत्री आनंदसिंग यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. एकंदर वेगवान राजकीय घडामोडी पाहता निवडणुकीला एक वर्षाहून अधिक कालावधी शिल्लक असला तरी आतापासूनच वातावरण निर्मिती सुरू झाली आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर यासंबंधीचे चित्र स्पष्ट स्वरुपात सामोरे येण्याची शक्मयता आहे.