छत्तीसगडमध्येही काँगेसमधील मतभेद चव्हाटय़ावर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक सहा महिन्यांच्या अंतरावर आलेली असताना सत्ताधीश काँगेसचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या विरोधात आमदारांनी आणि काही मंत्र्यांनी बंड पुकारले आहे. त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन काढून टाकावे, अशी मागणी या बंडखोरांनी काँगेसच्या राष्ट्रीय नेत्यांकडे केली आहे.
सुखजिंदरसिंग रंधावा, तृप्त राजिंदर बाजवा, सुखबिंदरसिंग सरकारिया आणि चरणजीतसिंग चन्नी या चार मंत्र्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेण्याचा मनोदय व्यक्त केला. अमरिंदरसिंग नेतृत्व देण्यग्नात असमर्थ ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वात काँगेसला विधानसभा निवडणुकीत विजय मिळणे दुरापास्त आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदावरुन काढून टाकावे अशी मागणी त्यांनी केली आहे. या मंत्र्यांना किमान 24 आमदारांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. पंजाब प्रदेश काँगेसचे महासचिव आणि आमदार परगटसिंग हे ही बंडखोरांसमवेत आहेत.
सिद्धूंची फूस
या बंडखोरांना नवज्योत सिद्धू यांची फूस आहे, असा आरोप अमरिंदरसिंग यांच्या गटाने केला आहे. या बंडखोरांनी दोन दिवसांपूर्वी सिद्धू यांची भेट घेतली होती. या भेटीतच मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्याचे धोरण ठरविण्यग्नात आले, असाही आरोप करण्यात आला. अमरिंदरसिंग नाराज झाल्यास काँगेसचे राज्यातील अस्तित्वच संपेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
पक्षश्रेष्ठी सिद्धूंवर नाराज
निवडणूक होईपर्यंत सिद्धूंनी अमरिंदरसिंग यांच्याशी जुळवून घ्यावे, अशी काँगेस श्रेष्ठींची इच्छा आहे. मात्र, सिद्धू अमरिंदरसिंग यांच्या मार्गात अडथळे हेतुपुरस्सर निर्माण करत आहेत. त्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांचे घोडे पुढे दामटायचे आहे, असा आरोप पंजाबमधील नेते करीत आहेत. यग्नामुळे राहुल गांधी आणि सोनिया गांधी सिद्धूंवर नाराज असल्याचे सांगण्यात येते.
छत्तीसगडमधील मतभेद चव्हाटय़ावर
काँगेसच्या ताब्यातील दुसरे राज्य छत्तीसगड येथेही या पक्षात मतभेद उफाळून आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल आणि आरोग्यमंत्री सिंगदेव यांनी आपापले गट तयार केले असून एकमेकांविरोधात राजकारणे सुरु केली आहेत. मंगळवारी संध्याकाळी दोन्ही गटांशी राहुल गांधी यांनी चर्चा केल्याचे वृत्त आहे. मात्र, चर्चेत काय निष्पन्न झाले हे समजू शकलेले नाही. दोन्ही गटांमधील मतभेद दूर झालेले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.