प्रतिनिधी / बेळगाव
हुक्केरी, गोकाक व खानापूर तालुक्मयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जी कामे चालू आहेत. त्यातील काम करणाऱया गटप्रमुखांसाठी (कायक बंधू) 2013 पासूनचे वाढीव शुल्क ताबडतोब मंजूर करण्यात यावे, यासाठी मनरेगा व असंघटित कामगार संघ यांच्यातर्फे ज्ये. समाजसेवक शिवाजी कागणीकर, ऍड. एन. आर. लातूर, शांतव्वा कुरबर, अडव्याप्पा कुंबरगी, बसवंत कोले, यल्लाप्पा गस्ती व राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्हा पंचायत ऑफीससमोर धरणे धरण्यात आले. यावेळी विविध तालुक्मयांतून आलेल्या कामगार बंधूंनी जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चेकऱयांना अधिकाऱयांकडून समाधानकारक आश्वासन मिळेपर्यंत घोषणाबाजी चालू होती. अधिकाऱयांनी महिन्याभराचा वेळ मागितला आहे. यावेळी बेळगाव, हुक्केरी, गोकाक व खानापूर तालुक्मयातील रोजगाराच्या कामावरील 200 च्या वर कामगार बंधू उपस्थित होते.