महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला कृष्ण कथा सांगताना पुढे म्हणतात – भदेचे संग्रामजित, बृहत्सेन, शूर, प्रहरण, अरिजित, जय, सुभद्र, वाम, आयू आणि सत्यक हे पुत्र होते. या पट्टराण्यांव्यतिरिक्त भगवंतांच्या रोहिणी इत्यादी आणखीही सोळा हजार एकशे पत्न्या होत्या. त्यांचे दीप्तिमान, ताम्रमान इत्यादी पुत्र होते.
असो ऐसें हरिसंतान । त्यामाजी मुख्य जो प्रद्युम्न। रुक्मिणीचा ज्ये÷ नंदन । तत्संतान अवधारा । प्रद्युम्नाची पूर्वभार्या । आणिली शंबर वधूनियां । त्यानंतरें रुक्मितनया । प्रणिली जाया रुक्मवती। प्रद्युम्नवीर्यें तिचे जठरिं । अनिरुद्ध जन्मला भोजकटनगरिं । महाबळि÷ प्रतापी क्षत्री । जेणें अंतुरी उषा केली ।
प्रद्युम्नाचा भोजकट नगरात राहणाऱया रुक्मीची कन्या रुक्मवती हिच्याशी विवाह झाला होता. तिच्यापासून बलशाली अनिरुद्धाचा जन्म
झाला.
राजा म्हणे बादरायणि । वक्तायांमाजी चातुर्यखाणी । संशय गमला निरूपणीं । तन्नरिमनीं मम प्रश्न । कृष्ण वधावयाकारणें । समय संधि लक्षी मनें । तो केंवि पुढती कन्यादानें । स्नेहवर्धना प्रवरे । पूर्वीं कृष्णें रुक्मिणीहरणीं । विटंबिला भीभत्सवपनीं। पराभविला समराङ्गणीं । तें तो मनीं शल्य स्मरे । भुजंग हाणीतला चरणें । तो न विसरे जिता मरणें। छिद्र लक्षी घ्यावय उसणें । अंतःकरणें हा तैसा । पुढती कृष्णाचिया सुता । केंवि देता झाला दुहिता। परम विस्मय हा गमला चित्ता । तो मज आतां निरूपिजे । परस्परें द्वेषनि÷ । घात करूं इच्छिती स्पष्ट। ऐसे वैरी तेचि प्रकट । केंवि संतुष्ट वैवाहिकें । विद्वान् म्हणिजे ज्ञानवंत । श्रे÷ असती ब्रह्माण्डांत । तांमाजी शुक समर्थ । कीं तूं ओगिचूडामणि। योगसिद्धीची ऐश्वर्यखाणी । देदीप्यमान जैसा तरणि। मम प्रश्नाच्या निरूपणीं । समर्थ जाणोनि प्रार्थितसें । म्हणसी रुक्मी भीष्मीकतनय । त्याचे हृदयींचा अभिप्राय । केंवि आम्हांसी ठाऊक होय । बहुत समय अतिक्रमल्या । अनागत पुढें जें होणार । योगियां अतीन्द्यानें गोचर। होवोनि गेले दिवस फार। तेंही गोवर प्रस्तुतवत् । चतुर्दिक्षु वर्तमान । देखती योगियांचे नयन । विप्रकृष्ट जे आच्छादन । कृतगोपन दूरस्त्थ । त्रिविध व्यवधानें व्यवहित । देशकाळपदार्थजनित । तेही योगियां दुष्य होत । अतीन्दियज्ञादृष्टि । ऐसें ऐकूनि नृपाचें वचन । आल्हादद्ययुक शुक सर्वज्ञ। करिता झाला निरूपण । तें सज्जन परिसोत ।
परिक्षिती राजाने महामुनी शुकदेवांना विचारले- हे विद्वन ! भगवान श्रीकृष्णांनी रणभूमीवर रुक्मीचा पराभव केला होता. त्यामुळे तो श्रीकृष्णांना मारण्यासाठी संधीची वाट पहात होता. अशा स्थितीत त्याने आपली कन्या शत्रूच्या मुलाला कशी दिली ? या दोन शत्रूंमध्ये पुन्हा परस्पर वैवाहिक संबंध कसा जुळून आला ? कारण योगीजन भूत, भविष्य आणि वर्तमानकाळातील इंद्रियातीत, पुष्कळ लांबच्या किंवा एखाद्या अडथळय़ामुळे न दिसणाऱया गोष्टीसुद्धा प्रत्यक्ष पहात असतात.
राया कुरुवर्य चक्रवर्ती । विदर्भतनया रुक्मवती। उपवर जाणोनि विदर्भनृपति । आदरी निगुती स्वयंवर।
Ad. देवदत्त परुळेकर