प्रतिनिधी / सातारा
वाढीव वीज बिल, थकीत एफआरपी बिल संदर्भात सातारा ते कराड असा पायी आक्रोश मोर्चा आज निघणार होता. त्या करिता स्वभामनी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे सातारा येथे उपस्थित होते.
मात्र पोलीस प्रशासनाने या कोरीना पार्श्वभूमीवर सदर आक्रोश मोर्चाला परवानगी नाकारली असून आज या ठिकाणी मोर्चा शासनाची बाजू समजून घेऊन स्वाभिमानी संघटनेने मोर्चाला स्थगिती दिली असून 25 तारखेला कराड येथे ते राजातील मंत्र्यांशी बोलणी करून देण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले.