सरस्वती वाचनालय, शहापूरच्या संगीत कलामंचतर्फे आयोजित पंडित कुमार गंधर्व स्मृती संगीत संमेलन उत्साहात पार पडले. नामवंत जुन्या जाणत्या गायक वादकांबरोबरच उदयोन्मुख गायकांनासुद्धा या संमेलनाने व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
या कार्यक्रमाचे पहिले पुष्प स्वानंदी सडोलीकर यांनी गुंफले. ‘मुलतानी’ या रागाने त्यांनी सुरूवात केली. सुंदर आलापी आणि स्वरांचा पेहराव याची उत्तम जाण असणाऱया स्वानंदी यांनी आपल्यातील कलागुणांचा आविष्कार दाखवला. मुलतानीची बढत प्रशंसनीय होतीच त्याचप्रमाणे त्यांनी सादर केलेले भजनही रंगले.
जबलपूरच्या नामवंत कलाकार पण मूळ कर्नाटकातील असणाऱया श्रीमती दुर्गा शर्मा यांनी आपल्या व्हायोलिन वादनात राग बिहाग अतिशय तयारीने पेश केला. सौम्य आलापी आणि चिजेच्या मुखडय़ाने त्यांच्या वादनातून मींडयुक्त तान, त्या बरोबरच चपळ तानानी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
श्रीमती आदिती जोशी या ग्वाल्हेर-आग्रा घराण्याच्या गायिका. या घराण्याच्या गायिकीबरोबरच उस्ताद अमान अलींच्या (भेंडीबजार) गायनाची छाप त्यांच्या सादरीकरणात दिसून आली. ‘काहे करत हो बरजोरी’ ही जोग रागामधील स्वरचित बंदीश त्यानी अतिशय तयारीने पेश केली. त्यांचा गायनातून या तीनही घराण्याचा परीस स्पर्श झाल्यामुळे त्यांचे गायनही बहारीचे झाले. साध गहतान धाढ, तेबोरेका हे गायन कलेशी नाते सांगणारे त्यांचे भजनही रंगले.
बेळगावचे राजप्रभू धोत्रे यांचे गायन म्हणजे श्रोत्यांना पर्वणीच होती. रविवारचे सकाळचे सत्र त्यांनी रंगवले. त्यांनी प्रारंभी राग कोमल ऋषभ आसावरी आळवला, संथ आलापी, या बरोबरच चपळ तानांचा हातखंडा असणारे राजप्रभू धोत्रे यांचे गायन बेळगावकरांना अभिमान वाटावा, असेच झाले. आपल्या गायनाची सांगता त्यांनी ‘दे हाता शरणांगता’ या नाटय़गीताने केली.
सकाळच्या सत्रातील दुसरे पुष्प प्रचला अमोणकर यांनी गुंफले. राग ‘अहिरभैरव’च्या विलंबीत एकतालातील चालीने त्यांची या रागावरची हूकमत जाणवली. शब्दांची स्पष्टता आणि सहज फिरणारा कसलेला रियाझी आवाज यामुळे प्रचला यांचे गाणे दाद मिळवून गेले.
शेवटच्या तृतीय सत्रातील पहिले पुष्प शिल्पा आठल्ये यांनी गुंफले राग ‘श्री’ ने त्यांनी मैफलीला प्रारंभ केला. त्याचबरोबर त्यांची गाण्यावरील हुकमतही स्पष्ट दिसत होती. मुळातच क्लीष्ट असणारा राग ‘श्री’ सहज सुंदरतेने सादर करण्याचे कसब आणि समेवर येणे मनाला भारावून टाकणारे होते. त्याबरोबर ‘कानडा राजा पंढरीचा’ हे आणि ‘हिरन हिरन, समज बुझ बान चरना’ हे दिपचंदी ठेक्मयावरील कुमार गंधर्वांचे निर्गुण भजन तितक्मयाच ताकदीने त्यांनी सादर करून आपल्या गाण्याची सांगता केली.
उस्ताद छोटे रहमतखान यांचे सतार वादन म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. त्यांनी खुलवलेला झपतालातील राग ‘किरवाणी’ मनाला मोहवून गेला. स्वरावरची त्यांची पकड आणि तालाची हुकमत पदोपदी दिसत होती. परंपरेने आलेले शास्त्रीय रागदारीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून त्यांचे गायन आनंद देणारे होते. नंतर खमाज रागातील एक छोटय़ा बंदीशीने त्यांनी आपल्या गायनाची सांगता केली.
पं. मिलिंद चिताल हे नाव आज शास्त्रीय गायनात सर्वश्रूतच आहे. आग्रा घराण्याची तालीम त्यांच्या गायनात ती पुरेपूर दिसते. नोमतीम च्या आलापीने त्यांनी राग ‘अभोगी कानडा’ सादर केला. त्यांची आलापी विलोभनीय अशीच होती.
दोन दिवसांच्या कार्यक्रमात संवादीनीवर सारंग कुलकर्णी तर तबल्यावर अनंत हेगडे आणि विनायक नाईक यांची समर्थसाथ कार्यक्रमाला वेगळी उंची देणारी ठरली. त्याच प्रमाणे केएलई सोसायटीच्या संगीत विभागातील विद्यार्थी मंजुश्री खोत व विजय बांदिवडेकर यांची तानपूरा साथही मोलाचीच होती. योग्य नियोजन, जाणकार श्रोतृवर्ग योग्य ध्वनी व प्रकाश योजना यामुळे कुमार गंधर्व स्मृति संमेलनाने सर्वांना स्वरानंद दिला. सूत्रसंचालन प्रिया कवठेकर, मीरा आजगावकर व विजय बांदीवडेकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी प्रायोजकांनी स्वीकारली. त्यामुळे सरस्वती वाचनालय हा कार्यक्रम व्यवस्थित पार करू शकली.
वाचनालयाचे पूर्वाध्यक्ष कै. पी. जी. कुलकर्णी यांचे नसणे सर्वांनाच जाणवले. मात्र विद्यमान अध्यक्षा स्वरूपा इनामदार आणि सर्व पदाधिकाऱयांनी तसेच कर्मचारी वर्गाने संमेलनाची धुरा यशस्वीपणे पेलली.
मनीषा सुभेदार