ओटवणे /प्रतिनिधी-
आचरा येथील यशराज प्रेरणा ग्रुप आणि आचरावासिय यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील १६० पूरग्रस्त कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. माडखोल धवडकी येथे ४५ पूरग्रस्त कुटुंबांना, शिरशिंगे येथील २० कुटुंबांना, कळणे गावातील ३५ कुटुंबांना, बांदा येथील ६० कुटुंबांना तांदूळ, साखर, कपडे, साबण, कडधान्य वितरण करण्यात आले.
यावेळी यशराज प्रेरणा ग्रुपचे पदाधिकारी मंदार जोशी, विद्यानंद परब, मिताली कोरगावकर, मालवण पंचायत समिती सदस्या निधि मुणगेकर, गौरव पेडणेकर, जीतू जुवेकर, चंदू कदम, केतन साळकर, पंकज घारे, धनश्री आचरेकर, समिर काजरेकर, माडखोल पोलीस पाटील उदय राऊत, भरत गावडे, सतीश घोडगे, शिंरशिंगे उपसरपंच पांडुरंग राउळ, पोलीस पाटील गणू राउळ, गणपत राणे आदी उपस्थित होते.