ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात आजपासून राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन लागू करण्यात येईल. देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र हेल्थ कार्ड देण्यात येईल. या कार्डमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची माहिती असेल. त्यामध्ये व्यक्तीचा आजार, आतापर्यंतच्या चाचण्या, डॉक्टरांनी दिलेली औषधे याची नोंद असेल, त्यामुळे अडचणीच्या काळात या हेल्थ कार्डद्वारे रुग्णांवर तात्काळ उपचार करणे शक्य होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधित केले. मोदी म्हणाले, देशावर कोरोनाचे संकट मोठे आहे. या संकटात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, ॲम्बुलन्स कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस जीवाची पर्वा न करता 24 तास कोरोनासाठी लढा देत आहेत.
कोरोनावर लस कधी येणार हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे. भारतातील तीन लसींच्या वेगवेगळ्या टप्प्यात चाचण्या सुरू आहेत. या चाचण्या यशस्वी होतील. शास्त्रज्ञांनी हिरवा कंदील दाखवल्यास या लसींचे उत्पादन सुरू होईल.
सात कोटी गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर देशातील सात कोटी गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर देण्यात आले. 80 कोटी पेक्षा जास्त लोकांना मोफत अन्न पुरवठा केला. 90 हजार कोटी लोकांच्या थेट बँक खात्यात जमा केले.