ऑनलाईन टीम / पाटणा :
अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे. त्या निर्णयानंतर सगळ्याच क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची देखील प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे बिहार सरकारची संपूर्ण प्रक्रिया योग्य असल्याचे स्पष्ट झाले. आता मला विश्वास आहे की सुशांत आणि त्याच्या कुटुंबियांना नक्की न्याय मिळेल.
पुढे ते म्हणाले की, आमच्या सरकारने जे काम केले ते कायदेशीर होते. या प्रकरणाचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही, सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी कारवाई केली गेली आहे. आता मला विश्वास आहे की सीबीआय कसून चौकशी करुन न्याय देईल. न्यायाची आशा फक्त कुटूंब किंवा बिहारलाच नाही तर संपूर्ण देशातील लोकांना आहे.