ओढ्यावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी, ओढ्यातील पाणी घेऊन महापालिकेवर बादली मोर्चा काढण्याचा इशारा
प्रतिनिधी / कोल्हापूर
ओढ्यावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाईच्या मागणीसाठी आपच्या कार्यकर्त्यानी बुधवारी चक्क सम्राटनगरातील ओढ्यात उतरून आंदोलन केले. पावसाळयात पुन्हा परिसरातील घरांमध्ये येथील पाणी शिरले तर ओढ्यातील घाण पाणी घेऊन महापालेकवर बदली मोर्चा काढण्याचा इशारा दिला.
सम्राटनगर येथील ओढ्यामध्ये एका अपार्टमेंटची सुरक्षा भिंत (रिटेनिंग वॉल) व सरकारी कार्यालयाने केलेल्या बांधकामामुळे पावसाळ्Îात रात्री-अपरात्री परिसरातील घरांमध्ये पाणी शिरत आहे. येथील अनाधिकृत बांधकामांवर कारवाईच वर्षभरापासून मागणी करूनही महापालिकेने दुर्लक्ष केल्याने आम आदमी पार्टीच्यावतीने बुधवारी सम्राटनगर येथील ओढ्यामध्ये उतरून आंदोलन केले.
ओढ्यातील अतिक्रमणे काढले नाही आणि पावसात पुन्हा घरांमध्ये पाणी आल्यास परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन महापालिकेवर ओढ्यातील पाणी घेऊन बादली मोर्चा काढू, असा इशाराही दिला. यावेळी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, युवाध्यक्ष उत्तम पाटील, मोईन मोकाशी, बसवराज हदीमनी, प्रथमेश सूर्यवंशी, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, आदम शेख आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांना उतरवले ओढ्यात
आंदोलनाची दखल घेत उपशहर नगररचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता बाबुराव दबडे येथे दाखल झाले. ‘आप’चे संदीप देसाईं यांनी त्यांना नाल्यात खाली उतरायाला भाग पाडले. त्यांच्यासोबत नाल्यातूनच अतिक्रमण झालेल्या ठिकाणची पाहणी केली. संबंधित अपार्टमेंट व सरकारी कार्यालयाही नोटीस बजावून अतिक्रमण काढण्याच्या कार्यवाही करू, अशी ग्वाही दिली.