प्रतिनिधी / वाळपई :
सध्या कर्नाटक सरकारने कळसा-भंडुरा प्रकल्पासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकून परवानगी मिळण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर म्हादई नदीवर मोठय़ा प्रमाणात संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे गोव्यात राजकीय स्तरावर मोठय़ा प्रमाणात खळबळ निर्माण झाली असली तरी सत्तरी तालुक्मयात मात्र याबाबत पूर्णपणे शांत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सदर प्रकल्प उभारण्यात त्यांचा सर्वप्रथम फटका सत्तरीला बसणार असून यामुळे सर्व क्षेत्रात निर्माण झालेली शांतता यांच्या पार्श्वभूमीवर सत्तरी तालुक्मयातील तरुणांनी एकसंघ होऊन स्वामी विवेकानंद जयंती निमित्त म्हादई नदीच्या तीरावर जाऊन ‘आमची म्हादय आमका जाय’ अशा प्रकारच्या घोषणा देऊन जनजागृती केली. यावेळी उपस्थित असलेले तरुण व गावातील नागरिकांनी एकूण नदीच्या संकटात संदर्भातील माहिती जाणून घेतली.
याबाबतची माहिती अशी की गेल्या काही वर्षांपासून गोवा व कर्नाटक दरम्यान म्हादई नदीच्या पाण्यावरून संघर्ष निर्माण झालेला आपणास पहावयास मिळतो. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट बनले असले तरी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने कर्नाटक सरकारला कळसा-भंडुरा प्रकल्प उभारण्यासाठी परवानगी दिलेली आहे. यामुळे म्हादई नदीवर मोठय़ा प्रमाणात संकट निर्माण होणार असून याचा प्रचंड फटका गोव्याला बसणार आहे. कर्नाटक राज्यातून गोव्यामध्ये प्रवेश करणारी नदी सर्वप्रथम सत्तरी तालुक्मयामध्ये प्रवेश करीत आहे. यामुळे सर्वप्रथम सत्तरी तालुक्मयाला याचा फटका बसणार आहे. तरीसुद्धा याबाबत मोठय़ा प्रमाणात आंदोलन उभारण्याची गरज असताना सध्यातरी सत्तरी तालुक्मयात पूर्णपणे शांतता असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यामुळे आज सामाजिक कार्यकर्ते विश्वेश परोब व इतरांनी ‘चलो उस्ते’ असा नारा दिला होता. त्याला अनुसरून आज सकाळी वाळपईच्या परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात तरुणांनी एकत्र येऊन म्हादई नदीचा संवर्धनात घोषणा दिल्या.
यावेळी नगरपालिकेच्या व्यासपीठावर आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी समारंभात पर्यावरणप्रेमी सूर्यकांत गावकर यांनी म्हादई नदीवर कळसा प्रकल्प झाल्यास त्याचे गंभीर परिणाम कशा प्रकारे होऊ शकतात यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यानंतर उपस्थित असलेल्या तरुणांनी बाईक रॅली करीत उस्ते गावात प्रवेश केला. ज्याठिकाणी कळसा-भंडुरा प्रकल्पाच्या नाला म्हादई नदीला भेटतो, त्याठिकाणी जाऊन ‘आमची म्हादय आमका जाय’ अशा प्रकारची घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
याप्रसंगी गावातील उपस्थित असलेल्या नागरिकांसमोर झालेल्या चर्चेत अनेक प्रकारच्या सविस्तर विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी नागरिकांनी गेल्या वषीपासून मार्च, एप्रिल महिन्यामध्ये पाण्याची प्रचंड प्रमाणात कमतरता निर्माण झाली आहे. कर्नाटक सरकारने पाणी वळविण्याचा प्रारंभ केल्यानंतर या नदीवर हळूहळू त्याचे प्रतिकूल परिणाम समोर येऊ लागले असून येणाऱया काळात यासंदर्भात गांभीर्याने विचार न केल्यास नदीचे अस्तित्व पूर्णपणे नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. या कळसा पाण्याचा प्रवाह म्हादई नदीसाठी अत्यंत पोषक आहे. त्याचप्रमाणे कृष्णापुर भागातून वाहणारी नदी यांचा प्रवाह सुद्धा नदीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या दोन्ही नदीचे प्रवाह बंद झाल्यास त्याचा फटका प्रचंड प्रमाणात बसणार आहे. यामुळे सत्तरीतील नागरिकांनी एकसंघ होऊन नदीच्या रक्षणार्थ सर्व प्रकारचे मतभेद विसरून एकत्र येणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते विश्वेश परब यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारला सत्तरी तालुक्मयाची कोणतीही किंमत नसून सध्यातरी सत्तरीत पसरलेली स्मशान शांतता येणाऱया काळात अनेक प्रकारचे धोके निर्माण करू शकतात. त्यामुळे सर्वांनी एकसंघ होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यानंतर स्वामी विवेकानंद यांच्या तस्विरीला पुष्पहार अर्पण केला व नदीच्या रक्षण करण्याची वचन घेतले. आगळय़ावेगळय़ा पद्धतीने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम हा अत्यंत चांगला असून याच माध्यमातून सत्तरी तालुक्मयामध्ये मोठय़ा प्रमाणात जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून मदत होणार असल्याचे नागरिकांनी यावेळी स्पष्ट केले.