जमीन मालकी प्रश्न विश्वजीतनी हातात घ्यावा
उदय सावंत/वाळपई
गोवा राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब यांनी सत्तरी तालुक्मयातील जनतेला जमिनीच्या संदर्भात न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून भरपूर प्रयत्न केले .मात्र त्यांचे प्रयत्न शेवटपर्यंत फळाला आले नाही. त्यानंतरच्या सरकारने यासंदर्भात फक्त राजकारणाच्या माध्यमातून निवडणुका डोळय़ासमोर ठेवून आश्वासने दिली. मात्र अजून पर्यंत पूर्ण मालकी हक्क देण्यात आलेले नाहीत. आम्ही ग्रामीण भागात राहतो, ही आमची चूक आहे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मालकी हक्क प्राप्त न झाल्यामुळे आज आयआयटी प्रकल्प सारखे भूत मेळावली भागातील भूमिपुत्रांच्या मानगुटीवर बसलेले आहे. सत्तरी तालुक्मयातील जनता ग्रामीण भागांमध्ये राहिली ही त्यांची चूक आहे का.? ग्रामीण भागांमध्ये राहिल्यामुळे त्यांना अशा प्रकारची शिक्षा व रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची पाळी यावी हे खरोखरच दुर्दैव आहे. अशा प्रकारच्या भावना आज माऊस खोथोडा वेळगे या भागातील भूमिपुत्रांनी व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळेच या आंदोलनाला आपण पूर्ण स्वरूपाचा पाठिंबा दिल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत.
सध्याचे वाळपई मतदारसंघाचे आमदार तथा गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांनी सत्तरी तालुक्मयाच्या सर्वांगीण विकासावर महत्त्वाचे भर दिलेली आहे. मात्र जमीन मालकीचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी आता आपल्या राजकीय बळाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा येणाऱया काळात भूमिपुत्रांना या प्रश्नासंदर्भात अनेक प्रकारच्या समस्या गंभीर स्वरूपात निर्माण होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही.
गेल्या 60 वर्षांपासून सत्तरी तालुक्मयातील भूमिपुत्र या हक्कासाठी लढा देत आहेत. मात्र त्यांच्या यामागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही हे खरोखरच दुर्दैवी स्वरूपाची आहे. सत्तरी तालुका हा आपण पश्चिम घाटाचा समृद्ध इतिहास असल्याचे सांगत आहोत. मात्र या भागातील जनतेच्या भूमिपुत्रांच्या जमीन मालकीचा प्रश्न लक्ष कोण देणार अशा प्रकारचा सवाल म्हाऊस गावातील ग्रामस्था?नी केलेला आहे. 1999 साली म्हादई अभयारण्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली. यामुळे या भागातील भूमिपुत्रांच्या मानगुटीवर दुसरे भूत बसलेले आहे. अनेकांच्या जमिनी आजही अभयारण्याच्या घशात गेलेले आहेत. मात्र अनेकवेळा प्रयत्न करूनही त्यासंदर्भात राजकारणी लक्ष देत नाहीत हेच खरे दुर्दैव आहे .आता शेळ मेळावली या ठिकाणी निर्माण झालेली गंभीर स्वरुपाची समस्या सत्तरी तालुक्मयाच्या म्हादई अभयारण्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या सत्तावीस गावांमध्ये अभयारण्य रूपी प्रकल्पाचे भूत डोक्मयावर टांगत्या तलवारीपणे उभे आहे .येणाऱया काळात ही टांगती तलवार कधीही भूमिपुत्रांच्या डोक्मयावर अआदळून त्यांचे अस्तित्व नेस्तनाबूत केल्यास त्याला जबाबदार कोण अशाप्रकारचा सवाल ग्रामस्था?नी केलेला आहे.
यामुळे सत्तरी तालुक्मयातील अनेक गावातील लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत .सरकारला जर खरोखरच येणाऱया काळात जमीन मालकीच्या संदर्भात आंदोलनाचा दुसरा धक्का सहन करायचा नसेल तर जमीन मालकीच्या प्रश्नासंदर्भात गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
सत्तरी तालुक्मयातील जवळपास 80 टक्के गावांमध्ये जमीन मालकीचा प्रश्नाची समस्या आहे. त्याचप्रमाणे सत्तरी तालुका हा पूर्णपणे गर्द झाडीच्या सानिध्यात राहणार आहे. वाळपई शहर सोडल्यास इतर सर्व 80 टक्के भाग पूर्णपणे जंगलाच्या संपर्कात आलेले भाग आहे .यामुळे या जंगलाची सेवा करून निसर्गाचा व पर्यावरणाचा संभाळ केल्यामुळेच सत्तरीवासियांना जमीन मालकीचा प्रश्नासंदर्भात अंधारात ठेवत आहात का अशा प्रकारचा सवालही खोथोडे भागातील भूमिपुत्रांनी केलेला आहे. सतरी भूमिपुत्र संघटना गेल्या दोन वर्षापासून या प्रश्नासंदर्भात आवश्यक स्तरावर लढा देत आहे. मात्र त्यांचा हा लढा सरकारच्या कानापर्यंत पोचत नाही हेच खरे दुर्दैव आहे. सरकारला जर येणाऱया काळात अशा प्रकारच्या लढय़ाला सामोरे जायचे नसेल तर जमीन मालकीचा प्रश्नासंदर्भात गांभीर्याने लक्ष द्यावे अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे.