वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विविध व्यवसायात कार्यरत असणारी कंपनी आयटीसी आपल्या व्यवसायाची पुनर्बांधणी करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठीची रणनीती आखली जात आहे. मालकी हक्क असणाऱया हॉटेल्सची संख्या कमी करण्याचे संकेत आयटीसीने व्यक्त केले आहेत. आता कंपनीजवळ 50 टक्के हॉटेल्स असून त्यात 10 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त कपात केली जाणार आहे.
हॉटेल व्यवसायामध्ये सर्वाधिक भांडवल गुंतवणूक करावी लागत असल्याचे कंपनीचे मत आहे. कंपनी हॉस्पिटॅलिटी व्यवसाय उभारण्यासाठी एक पर्यायी व्यवस्था तयार करण्यावर विचार करते आहे. एफएमसीजीसह हॉटेल आणि सिगारेटपर्यंतचा व्यवसाय करणारी कंपनी लाईफस्टाईल रिटेल व्यवसायाचा विचार करत असून कंपनी न्यू नॉर्मलपासून आता नेक्सट नॉर्मलची तयारी करत असल्याचे आयटीसीचे चेअमन आणि एमडी संजीव पुरी यांचे म्हणणे आहे.
आयटीसीची स्थिती
आयटीसी हॉटेल्सकडे 10 हजार रुम्स असून अधिकतर नवीन रुपात आहेत. कंपनीच्या योजनेनुसार रुम्सची संख्या 14,000वर पोहोचली आहे.