ऑनलाईन टीम / मुंबई :
29 मार्च 2020 पासून इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 24 मे रोजी मुंबईत होणार आहे. आयपीएलच्या 13 व्या हंगामासंदर्भात आज, गव्हर्निग काऊसिलच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा आणि अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते. यंदा आयपीएल 2020 मध्ये फक्त 5 दिवस दोन सामने खेळवले जाणार आहेत. तसेच डे-नाईट सामना 8 वाजता सुरू होईल.