वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे भारतीय जनतेची ससेहोलपट होत आहे. या संकटामुळे केवळ शारीरिक धोका निर्माण झाला नाही तर संपूर्ण देशाच्या आर्थिक स्थितीवरही विपरित परिणाम झाला आहे. या संकटामुळे भविष्य अंधकारमय झाल्याचे जाणवते. अशा स्थितीत खेळाडूंच्या आर्थिक आणि मानसिक स्थितीला जबरदस्त धक्का पेचत असल्याचे प्रतिपादन बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयने केले आहे.
संपूर्ण जगात कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने सुरू झाल्यानंतर आतापर्यंत बळींची संख्या 40 हजार झाली असल्याने युरोपियन देशांना या संकटाचा जबरदस्त फटका बसला आहे. इटली, स्पेन, अमेरिका या तीन देशांमध्ये मृतांचा आकडा वाढतच आहे. भारतातील कोरोनाची परिस्थिती बिकट असली तरी संपूर्ण देश या संकटातून सहीसलामत बाहेर पडेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. पण जनतेची साथ जरुरीची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शासनातर्फे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर नागरिकांनी आपल्या ाारांमध्ये सुरक्षित रहावे. तसेच नियमांचे पालन करावे, अशी विनंती पंतप्रधान मोदी यांनी जनतेला वारंवार केली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून याचा फटका खेळाडूंना निश्चितच बसला आहे. कोरोनाचे संकट केव्हा संपेल हे निश्चित सांगता येत नसल्याने खेळाडूंची मानसिक स्थिती विचित्र आणि केविलवाणी झाली आहे. त्यांच्या आर्थिक स्थितीलाही चांगलाच फटका बसला आहे. ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे येत्या जुलैमध्ये विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा रद्द केल्याची घोषणा आयोजकांनी केली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाची लागण झपाटय़ाने पसरत असल्याने संपूर्ण देशामध्ये खबरदारीचे उपाय घेण्यात आले आहेत. क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक खेळाडूला कोरोना व्हायरसचा फटका बसला असून त्याच्या आर्थिक आणि मानसिक स्थितीवर त्याचा विपरित परिणाम होऊ शकेल, असे 27 वषीय प्रणॉयने म्हटले आहे.